शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

‘गोपीनाथरावांचे विचार प्रेरणादायी’

By admin | Updated: June 4, 2017 00:29 IST

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी, शेतमजुरासाठी संघर्ष केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी, शेतमजुरासाठी संघर्ष केला आहे. त्यांची प्रेरणा घेऊनच हे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनी केले. परळीतील गोपनाथगडावर शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षीय समारोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, आजचा दिवस एकीकडे दु:खाचा तर दुसरीकडे प्रेरणेचा दिवस आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांची प्रेरणा घेऊन राज्य सरकार काम करीत आहे. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी शेतमजुरांच्या पाठिशी राज्यशासन खंबीरपणे उभा आहे. वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ@खोत, खा. सुनील गायकवाड, खा. प्रीतम मुंडे, प्रज्ञाताई मुंडे, आ.सुजीत सिंह ठाकुर, आ. सुधाकर भालेराव, आ.संगीता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.मोनिका राजळे, आ. मोहन फड, आ. तानाजी मुटकुळे, आ. विनायक मेटे, रासप नेते अमित पालवे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ. केशव आंधळे, माजी आ. पाशा पटेल, माजी आ.विजय गव्हाणे, प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, फुलचंद कराड, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे , रत्नाकर गुट्टे, ज्ञानोबा मुंडे, मोनिका राजुरे, प्रवीण घुगे, परभणी जि.प. सभापती श्रीनिवास मुंडे, रमेश आडसकर, डॉ.हजारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.