शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे संस्था दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:12 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापन केलेल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेसाठी १५० कोटी रुपये निधी मंजूर केला होता. मात्र, सव्वावर्ष उलटून गेले तरीही सरकारने एक रुपया दिलेला नाही.

ठळक मुद्देघोषणा केलेले १५० कोटी मिळेनात : विद्यापीठ फंडातून संस्थेचा कारभार

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापन केलेल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेसाठी १५० कोटी रुपये निधी मंजूर केला होता. मात्र, सव्वावर्ष उलटून गेले तरीही सरकारने एक रुपया दिलेला नाही.भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याच्या विकासातील योगदानाची दखल घेत विद्यापीठाने त्यांच्या नावाने ग्रामीण विकासावर संशोधन करणारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विद्यापीठाने देशभर विविध संस्थांची पाहणी करत दर्जेदार अहवाल तयार करून राज्य सरकारकडे पाठवला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संस्था सुरूहोणार असल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विद्यापीठाने पुढाकार घेत संस्थेसाठी इमारतीसह निधीही उपलब्ध करून दिला. २०१६-१७ या वर्षात या संस्थेमार्फत ९ विषयांमध्ये पदविका अभ्यासक्रम आणि ८ विषयांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमही राबवला. पहिल्याच वर्षी या संस्थेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, संस्थेसाठी स्वतंत्र इमारत, कर्मचारी, जागा, पायाभूत सुविधा अशा विविध बाबींसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी विद्यापीठ उभा करू शकत नसल्यामुळे राज्य सरकारने संस्थेच्या उभारणीसाठी निधी द्यावा, यासाठीचा एक प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्यामुळे ही प्रक्रिया तात्काळ मार्गी लागण्याची अपेक्षा होती. त्या दिशेने पावलेही पडली. मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ४ आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेत बैठक घेतली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे संस्थेसाठी १५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हा सर्वांनी राज्य सरकारचे आभारही मानले होते. मात्र, हा घोषित झालेला निधी सव्वा वर्षांनंतरही विद्यापीठाला मिळालेला नाही. विशेष म्हणजे २०१७-१८ च्या राज्य अर्थसंकल्पात या संस्थेसाठी एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही.याचवेळी विद्यापीठाने या वर्षीच्या आपल्या अर्थसंकल्पात संस्थेच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून मानद संचालकांच्या वेतनासह संस्थेचा इतर खर्च भागविण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे संस्थेकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट होत आहे. याविषयी संस्थेचे मानद संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.केवळ चार विषयांना मिळाली मान्यताराज्य सरकारने गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय संस्थेत आतापर्यंत चार विषयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, रुरल इकॉनॉमिक्स बँकिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्री, कन्झर्व्हेशन अॉफ बायोडार्व्हसिटी आणि रुरल टेक्नॉलॉजी या विषयांचा समावेश आहे, तसेच संस्थेला निधी देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. मात्र, या समितीच्या केवळ बैठकांवर बैठका सुरूआहेत. ठोस निर्णय घेण्यात येत नाही.यावर्षी एकही प्रवेश नाहीगोपीनाथ मुंडे संस्थेमध्ये मागील मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतले होते. यावर्षी हा प्रतिसाद कमी झाल्यामुळे एकाही विषयाला प्रवेश देण्यात आलेला नाही. आता पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या चार विषयांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून निधी मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनासह संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे,नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गजानन सानप आदी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नाही.