शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्याईवर निवडून येणे आता अशक्य

By admin | Updated: April 17, 2017 23:30 IST

माजलगावमागील निवडणुकांमध्ये आपण स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईवर निवडून आलो. मात्र, यापुढे त्यांच्या पुण्याईवर निवडून येणे अशक्य आहे.

पुरूषोत्तम करवा माजलगावमागील निवडणुकांमध्ये आपण स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईवर निवडून आलो. मात्र, यापुढे त्यांच्या पुण्याईवर निवडून येणे अशक्य आहे. आता स्वकर्तृत्वावर निवडणुका लढवाव्या व जिंकाव्या लागतील, अशी जाहीर कबुली पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी दिली.येथे भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी त्यांनी गटातटाच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त करून नेते व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, डॉ. प्रकाश आनंदगावकर, डॉ. अशोक तिडके, राजाभाऊ मुंडे, गोरख धुमाळ, किसन नाईकनवरे, नितीन नाईकनवरे, नगराध्यक्ष सहाल चाऊस, अरूण राऊत, हनुमान कदम यांची उपस्थिती होती.पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. माजलगाव मतदारसंघात पक्षाचा आमदार असताना एकही उमेदवार जिंकू शकला नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दमछाक झाली, अशी नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. यातून काहीतरी शिका. गट-तट विरून एक दिलाने भाजपची संघटन बांधणी करा, असा सल्लाही त्यांनी दिला. आजचे रोडरोलर उद्याचे कमळ असेल, असे सूचक विधान करून त्यांनी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले.पालकमंत्र्यांनी गटातटावर नेत्यांसमोरच भाष्य केल्याने वातावरण काहीसे गंभीर बनले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या काही बंडखोर उमेदवारांसोबत छुपी युती केली होती त्यामुळे भाजपच्या मताचे विभाजन होऊन पक्षाला त्याचा मोठा फटका बसला होता. पंकजा मुंडे यांचा नाराजीचा सूर आ. देशमुख यांच्या दिशेने होता हे लपून राहिले नाही.