शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भक्तिभावाचे मंगलमय सूर

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

पैठण : भानुदास-एकनाथचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर बुक्का अशा वेशातील वारकऱ्यांच्या उपस्थितीने आज पैठणनगरी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गजबजून गेली.

पैठण : मुखी विठुनामाचा गजर, हातात भगवी पताका, भानुदास-एकनाथचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर बुक्का अशा वेशातील वारकऱ्यांच्या उपस्थितीने आज पैठणनगरी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गजबजून गेली. भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घालीत लाखो भाविकांनी आज गोदास्नान करीत नाथांचे दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी नाथ मंदिरात भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. वारकऱ्यांच्या मांदियाळीने पैठणनगरीत भक्तिभावाचे मंगलमय सूर दिवसभर निघत होते.पहाटेपासूनच विविध वाहनांनी व दिंड्यांसह हजारो भाविकांचे शहरात आगमन सुरू होते. शहरातील सर्व धर्मशाळा, मठ आदींमध्ये हे भाविक व वारकरी मुक्कामी थांबले होते. भाविकांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत होते. आज पहाटेपासून नाथ मंदिरापाठीमागील मोक्षतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णकमल तीर्थावरील गोदावरीच्या घाटावर पवित्र स्नानासाठी महिला व पुरुषांनी गर्दी केली होती. पहाटेपासून सुरू असलेले गोदास्नान दिवसभर सुरूच होते. गोदेचे स्नान करून, नाथांचे दर्शन घेऊन वारकरी प्रसन्न मनाने परत फिरत होते. जे भाविक पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, ते भाविक पैठणला येऊन नाथांचे दर्शन घेतात. आषाढीची ही परंपरा असल्याने आज लाखो भाविकांनी नाथांचे दर्शन घेतले. दिवसभरात दीड लाख भाविकांनी नाथ मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली, असे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यांनी सांगितले.पैठण वारीतूनही विठोबाच्या भेटीचे सुख मिळते, असे अनेक वारकऱ्यांनी पैठणवारीचे महत्त्व सांगितले. आषाढी वारीसाठी आज औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक, जळगाव, परभणी आदी जिल्ह्यांतून वारकरी आले होते.वारकऱ्यांना सुरळीत दर्शन घेता यावे म्हणून नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संजय वाघचौरे, कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी, आय.पी.एस. पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम, ए.पी.आय. केंद्रे, फौजदार अंकुश पाटोळे, संपत पवार आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. श्री एकनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)पावसाचे आगमन झाल्याने आनंद द्विगुणितगेल्या दोन दिवसांपासून पैठण शहरासह तालुक्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते, परंतु पाऊस आला नव्हता. आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांनी नाथांना पावसासाठी साकडे घातले. सायंकाळी खरोखर पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. हजारो भाविकांनी नाथ महाराज व विठुरायाचा जयघोष करीत मंदिर परिसर दणाणून सोडला. भर पावसातही दर्शन घेण्यासाठी भाविकात उत्साह होता.