शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

उत्पादकांना अच्छे दिन !

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

लातूर : देशात मोदी सरकार स्थापनेनंतर ‘अच्छे दिन वाले है’ अशा चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे़

लातूर : देशात मोदी सरकार स्थापनेनंतर ‘अच्छे दिन वाले है’ अशा चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे़ कारण अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला भाजीपाल्याचे भाव अचानक कडाडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ लातुरात आठवडाभरात पालेभाज्यांचे भाव जवळपास तिप्पट वाढले आहेत़ परिणामी, किचन बजेट कोलमडले असून मूग, मसूर व तुरीच्या डाळीचेही भाव वाढले आहेत़ भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’ असले तरी ग्राहकांसाठी मात्र ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़दैनंदिन आहारात जीवनावश्यक असलेल्या पालेभाज्यांचे वाढ आठवडाभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे़ भेंडी, दोडका, कारले, बटाटे, कांदे, गवार, पालक, शेपू, मेथी आदी पालेभाज्यांचे दर जवळपास तीन पटीत वाढले आहेत़ आठवडाभरापूर्वी किरकोळ बाजारात १० ते २० रूपये प्रतिकिलो विकणाऱ्या भाज्यांचा भाव सध्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे सुरू आहे़ दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात दुप्पट वाढ मिळत असली तर प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र तिप्पट वाढीने महागाईचा सामना करावा लागत आहे़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीमार्केट येथे भाजीपाल्याची आवक घटली आहे़ आवक कमी व मागणी जास्त असल्याने दरवाढीचा चटके सुरू झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)बाजारात भाजीपाल्याचे भाव आठवडाभरातच कडाकडले. पंधरा दिवसांपूर्वी १० रूपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भाज्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे आहेत़ पालक, मेथी, शेपूची जुडी १५ ते २० रुपयांना विक्री होत आहे. शिवाय, वांगे ६० रुपये, बटाटे २० ते ३०, कांदा १० ते २०, गवार ६० ते ८०, ढोबळी मिरची ४० ते ६०, शेवगा शेंग ४० रुपये, चवळी शेंग ६० ते ७० रुपये, कोबी ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, दुधी भोपळा ३० ते ४०, काकडी ३० ते ४० रुपये किलो असे दर आहेत. १५ दिवसांपूर्वी बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये किलोप्रमाणे मिळत होत्या. भाजीपाल्याची किरकोळ विक्रीही चढ्या दराने केली जात आहे.