शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

उत्पादकांना अच्छे दिन !

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

लातूर : देशात मोदी सरकार स्थापनेनंतर ‘अच्छे दिन वाले है’ अशा चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे़

लातूर : देशात मोदी सरकार स्थापनेनंतर ‘अच्छे दिन वाले है’ अशा चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे़ कारण अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला भाजीपाल्याचे भाव अचानक कडाडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ लातुरात आठवडाभरात पालेभाज्यांचे भाव जवळपास तिप्पट वाढले आहेत़ परिणामी, किचन बजेट कोलमडले असून मूग, मसूर व तुरीच्या डाळीचेही भाव वाढले आहेत़ भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’ असले तरी ग्राहकांसाठी मात्र ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़दैनंदिन आहारात जीवनावश्यक असलेल्या पालेभाज्यांचे वाढ आठवडाभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे़ भेंडी, दोडका, कारले, बटाटे, कांदे, गवार, पालक, शेपू, मेथी आदी पालेभाज्यांचे दर जवळपास तीन पटीत वाढले आहेत़ आठवडाभरापूर्वी किरकोळ बाजारात १० ते २० रूपये प्रतिकिलो विकणाऱ्या भाज्यांचा भाव सध्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे सुरू आहे़ दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात दुप्पट वाढ मिळत असली तर प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र तिप्पट वाढीने महागाईचा सामना करावा लागत आहे़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीमार्केट येथे भाजीपाल्याची आवक घटली आहे़ आवक कमी व मागणी जास्त असल्याने दरवाढीचा चटके सुरू झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)बाजारात भाजीपाल्याचे भाव आठवडाभरातच कडाकडले. पंधरा दिवसांपूर्वी १० रूपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भाज्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे आहेत़ पालक, मेथी, शेपूची जुडी १५ ते २० रुपयांना विक्री होत आहे. शिवाय, वांगे ६० रुपये, बटाटे २० ते ३०, कांदा १० ते २०, गवार ६० ते ८०, ढोबळी मिरची ४० ते ६०, शेवगा शेंग ४० रुपये, चवळी शेंग ६० ते ७० रुपये, कोबी ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, दुधी भोपळा ३० ते ४०, काकडी ३० ते ४० रुपये किलो असे दर आहेत. १५ दिवसांपूर्वी बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये किलोप्रमाणे मिळत होत्या. भाजीपाल्याची किरकोळ विक्रीही चढ्या दराने केली जात आहे.