शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

गोंदेगाव परिसराला गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: August 22, 2014 00:57 IST

जालना : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुनार्गमन केले. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात अंबड आणि मंठा तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला.

जालना : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुनार्गमन केले. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात अंबड आणि मंठा तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला.जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरात गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ४.९१ मि. मी पाऊस पडल्याची नोंद आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अद्यापपर्यंत दमदार पाऊस पडलेला नाही. गुरूवारी जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला.तसेच काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. जालना तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात पडलेल्या पावसाची नोद जालना- ८ मि. मी. भोकरदन-१७.३८, जाफराबाद २ मि. मी, बदनापूर १.८०, अंबड ००, घनसावंगी ८.७१, मंठा ००, अशी एकून सरासरी ४.९१ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त १३०.२१ मि. मी पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यात सर्वाधिक १९८ मि. मी. भोकरदन तालुक्यात तर सर्वात कमी मंठा तालुक्यात ६६.५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. तीन महिन्यानंतर पाऊसकेदारखेडा: भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पूर्णा नदीला पाणी आले. पोळा सणाच्या तोंडावर पाऊस आल्याने शेतकरी आनंदीत झाले आहे.केदारखेडा परिसरात दडीमारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाया गेलेली आहे. काही शेतकऱ्यांची पिके ठिबकच्या पाण्यावर जीवंत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पिकांना बुधवारच्या पावसाने जीवदान मिळाले आहे. परिसरातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्यांदाच नदीला पाणीकेदारखेडा परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला यावर्षी बुधवारी पडलेल्या पावसामुळे पहिल्यांदाच पाणी आले आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. नदीपात्रात केदारखेडासह परिसरातील सुमारे २९ गावांच्या पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक विहीरी आहेत. (प्रतिनिधी)जामवाडी: जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. अचानक झालेल्या या गारपिटीमुळे शेडनेट हाऊस मधील काकडी, सिमला मिरचीचे आतोनात नुकसान झाले. शिवाजी वाघ या शेतकऱ्याने बिजोत्पादनासाठी तयार केलेल्या नेट हाऊस मधील फळ धारणेस आलेल्या पिकांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. ४काशिनाथ वाघ यांच्या मोसंबीचे आतोनात नुकसान झाले. तसेच कपासी व अन्य पिकांचे ही मोठे नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी याची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, अनुराग कपूर, सुधाकर वाढेकर आदींची उपस्थिती होती. तसेच मंडळ अधिकारी ठोंबरे, तलाठी खोतकर यांनी पाहणी केली.४चार महिन्यात तिसऱ्यांदा गारपीट - गोंदेगाव परिसरात गेल्या चार महिन्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली. तीनही वेळेस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.