शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जालना : पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातून सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेस राज्य शासनानेही स्वीकारले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातून सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेस राज्य शासनानेही स्वीकारले असून, याच धर्तीवर काही ्रदिवसांपूर्वी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. हे घाणेवाडी जलसंरक्षण मचच्या कामाची पावती असल्याचे मत प्रख्यात उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, तेजस्वीनी संस्था आणि मुस्कान प्रबोधन मंचच्या वतीने देण्यात येणारा पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत रायठठ्ठा यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत आपली भूमिका मांडली. काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियातील एक ग्राहक आपल्या कंपनीत आला होता. तेव्हा त्याला घाणेवाडी जलाशय परिसरात भटकंती करण्यास घेऊन गेलो. तेंव्हा त्याने जाणीव करुन दिली की या धरण वा जलाशयातील गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किमत आहे. त्याचे महत्त्व कळल्यानंतर साधारणपणे पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलसंरक्षण मंच स्थापन करुन या जलाशयातील गाळ उपसा मोहीम हाती घेण्यात आली. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. परिणामी परिसरातील शेतीचा पोतही सुधारला आणि दुषित झालेले जलस्त्रोतही शुद्ध झाले. आगामी काळात घाणेवाडी जलाशय परिसरात वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि वरील भागातून येणारा गाळही येऊ शकणार नाही. जलाशयाची साठवण क्षमताही वाढणार आहे. आम्हाला आजही धरणातील गाळाचे महत्त्व कळालेले नाही. ते कळलेच तरच जलस्त्रोत स्वच्छ राहतील. त्याचप्रमाणे शेतीचा पोतही निश्चितपणे सुधारण्याची संधी मिळेल, अशी भावना रायठठ्ठा यांनी व्यक्त केली.