शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

३० दिवसांपासून सराफा बाजार बंदच; दीड अब्जची उलाढाल ठप्प !

By admin | Updated: March 31, 2016 00:31 IST

लातूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सराफांवर अबकारी कर प्रस्तावित करुन तो लागू केला आहे़ अबकारी करासह जाचक अटी रद्द कराव्यात,

लातूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सराफांवर अबकारी कर प्रस्तावित करुन तो लागू केला आहे़ अबकारी करासह जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी लातूर जिल्हा सुवर्णकार सराफा असोशिएशनने गेल्या ३० दिवसांपासून सराफा बाजार बंद ठेऊन निषेध नोंदविला आहे़ परंतु, केंद्र शासन कोणतीही पाऊले उचलत नसल्याने या आंदोलनाचा सर्वाधिक फटका ग्राहकांना बसत आहे़ सध्या लग्नसराई सुरु असून ग्रॅमभर सोनेही मिळेनासे झाल्याने ग्राहकांची धावाधाव सुरु आहे़ जिल्ह्यातील १ अब्ज ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल ठप्प झाली आहे़ केंद्रीय अर्थसंकल्पात सरकाने अबकारी कर प्रस्तावित करुन काही जाचक अटी लागू केल्या आहेत़ अबकारी कर रद्द करावा, तसेच जाचक अटीही शिथील कराव्यात या मागणीसाठी लातूर जिल्हा सुवर्णकार सराफा असोशिएशनने जिल्ह्यात १ मार्चपासून बेमुदत बाजारपेठ बंद आंदोलन सुरु केले आहे़ जिल्ह्यात ११८० सराफा दुकाने असून ६० हजार कामगार आहेत़ गेल्या ३० दिवसांपासून हे आंदोलन सुरु असतानाही सरकारकडून कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ग्राहकच अडचणीत सापडले आहेत़लातूर जिल्ह्यात दररोज जवळपास ५ कोटींपेक्षा जास्त सोने- चांदीतून उलाढाल असते़ सध्या दुष्काळी परिस्थिती आहे़ त्याचबरोबर यंदाच्या उन्हाळ्यात लग्नतिथी कमी आहेत़ त्यामुळे विवाह जमलेल्यांची शुभकार्य उरकरण्यासाठी धावपळ सुरु आहे़ विवाह समारंभासह अन्य कार्यांसाठी अनेकजण सोने खरेदी करीत असतात़ परंतु, सराफा बाजारच बंद असल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत़ अनेकदा हेलपाटे मारुही ग्रॅमभरही सोने मिळत नसल्याने ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे़ शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी लातूर जिल्हा सुवर्णकार सराफा असोशिएशनच्या वतीने पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ त्यानंतर चर्चासत्र घेण्यात आले़ तसेच रस्ता स्वच्छ करण्याचे आंदोलन केले़ मात्र, अद्यापही सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही़ सरकार धोरणाच्या त्रांगड्यात सराफा व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकही अडकले आहेत़ परिणामी, १ अब्ज ५० कोटींची जिल्ह्यातील उलाढाल ठप्प झाली आहे़