शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

गोदावरी नदी पैठणमध्ये दूषित

By admin | Updated: July 4, 2017 05:15 IST

आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी

संजय जाधव/लोकमत न्यूज नेटवर्कपैठण (जि. औरंगाबाद) : आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प महिनाभरापासून तांत्रिक अडचणीने बंद पडल्याने गोदावरी पात्रात महिनाभरापासून पाणी साचले असून, त्यात सांडपाणी येत आहे. गोदापात्रातील पाण्यावर हिरवट व दुर्गंधीयुक्त असा तवंग दाटला आहे. या पाण्यात स्नान केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने हे पाणी खाली सोडून द्यावे व वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प ४ जूनपासून बंद पडला आहे. त्यामुळे धरणातून गोदावरीत व पुन्हा धरणात पाणी लिफ्ट करण्याची प्रक्रिया थांबली आहे. सांडपाण्याचे दहा नाले गोदावरीच्या पात्रात येतात. दहा नाल्यांचा गोदावरी संगमपैठणमधील सांडपाणी वाहून आणणारे १० नाले दररोज लाखो लीटर घाण पाणी आणून सोडत आहेत. सोबतच रोज दशक्रिया विधीची हजारो किलो रक्षा पात्रात विसर्जित करण्यात येते. दूषित पाण्यात स्नान केलेल्या भाविकांना अंगास खाज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे, अंगार होणे अशा विविध त्वचा आजारास सामोरे जावे लागते. जायकवाडी धरणावरील विद्युत प्रकल्पाची दुरुस्ती सुरू असून त्यासाठी आठ दिवस लागतील, असे जलविद्युत प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्याधर लोणीकर यांनी सांगितले. गोदावरीच्या पात्रात पैठण शहराचे सांडपाणी नाल्याद्वारे मोठ्या प्रमाणात येऊन मिसळते. त्यामुळे पाण्याचे युट्रॉफिकेशन (शेवाळीकरण) वाढले, अशी माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी या वेळी दिली.