शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

घाटीत पहिल्या रुग्णापासून दिले

By | Updated: December 4, 2020 04:04 IST

खबरदारी : रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका आधीच ओळखला, औषधी बंद केल्याने होते गुंतागुंत औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत कोरोना ...

खबरदारी : रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका आधीच ओळखला, औषधी बंद केल्याने होते गुंतागुंत

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका वाढत असल्याचे सांगितले जाते; परंतु हा धोका घाटीतील डॉक्टरांनी खूप आधीच ओळखला होता. येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णापासून रक्त पातळ होणारी औषधी दिली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु घरी गेल्यानंतर रुग्ण स्वत:च्या मनाने औषधी घेणे बंद करीत असल्याने गुंतागुंत वाढून पुन्हा रुग्णालयात यावे लागत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या करोनाग्रस्तांच्या शरीरात डी-डायमर प्रथिनाची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. त्यावर रक्त पातळ करण्याचे औषध प्रभावी उपचार ठरत असल्याचे निरीक्षण कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदविले आहे. त्यानुसार घाटीत कोरोना रुग्णांना ही औषधी दिली जातात.

फुप्फुसाच्या रक्तवाहिन्यांत अशा गुठळ्या झाल्यास दम लागणे, शरीरातील ऑक्सिजन कमी होणे, त्याचप्रमाणे न्यूमोनियासारखी लक्षणे दिसतात. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर अनेक रुग्ण औषधी स्वत:च्या मनाने बंद करून टाकतात. त्यातून रुग्ण पुन्हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात येतात. घाटीत अशा प्रकारे काही रुग्ण दाखल झाले. रक्तवाहिन्यांतील गाठीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नियमितपणे औषधी घ्यावी

घाटीत पहिल्या रुग्णापासून रक्त पातळ होणारी औषधी दिली जात आहेत. ही औषधी महत्त्वपूर्ण ठरतात; परंतु अनेक जण घरी गेल्यानंतर औषधी बंद करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतली पाहिजे. कमीत कमी ३ महिने औषधी, उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

-डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी