शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

घाटीत पहिल्या रुग्णापासून दिले

By | Updated: December 4, 2020 04:04 IST

खबरदारी : रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका आधीच ओळखला, औषधी बंद केल्याने होते गुंतागुंत औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत कोरोना ...

खबरदारी : रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका आधीच ओळखला, औषधी बंद केल्याने होते गुंतागुंत

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका वाढत असल्याचे सांगितले जाते; परंतु हा धोका घाटीतील डॉक्टरांनी खूप आधीच ओळखला होता. येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णापासून रक्त पातळ होणारी औषधी दिली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु घरी गेल्यानंतर रुग्ण स्वत:च्या मनाने औषधी घेणे बंद करीत असल्याने गुंतागुंत वाढून पुन्हा रुग्णालयात यावे लागत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या करोनाग्रस्तांच्या शरीरात डी-डायमर प्रथिनाची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. त्यावर रक्त पातळ करण्याचे औषध प्रभावी उपचार ठरत असल्याचे निरीक्षण कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदविले आहे. त्यानुसार घाटीत कोरोना रुग्णांना ही औषधी दिली जातात.

फुप्फुसाच्या रक्तवाहिन्यांत अशा गुठळ्या झाल्यास दम लागणे, शरीरातील ऑक्सिजन कमी होणे, त्याचप्रमाणे न्यूमोनियासारखी लक्षणे दिसतात. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर अनेक रुग्ण औषधी स्वत:च्या मनाने बंद करून टाकतात. त्यातून रुग्ण पुन्हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात येतात. घाटीत अशा प्रकारे काही रुग्ण दाखल झाले. रक्तवाहिन्यांतील गाठीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नियमितपणे औषधी घ्यावी

घाटीत पहिल्या रुग्णापासून रक्त पातळ होणारी औषधी दिली जात आहेत. ही औषधी महत्त्वपूर्ण ठरतात; परंतु अनेक जण घरी गेल्यानंतर औषधी बंद करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतली पाहिजे. कमीत कमी ३ महिने औषधी, उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

-डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी