शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘संत एकनाथ कारखाना’ घायाळ कंपनीला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील शीला अतुलटेक शुगरने कारखाना सुरळीत चालू करून महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच हा कारखाना पुन्हा यापूर्वी करार केलेल्या सचिन घायाळ कंपनीस चालविण्यास द्यावा, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.दरम्यान, साखर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयास तातडीने न्यायालयात आव्हान दिले असून, संत एकनाथ आम्हीच चालवू, असे विद्यमान चेअरमन तुषार शिसोदे यांनी ठामपणे सांगितले आहे.संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मे. सचिन घायाळ कंपनीस २०१४/१५ ला तत्कालीन संचालक मंडळाने पुढील १८ वर्षे चालविण्यासाठी सहभागी तत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. याबाबतचा करार ३ आॅगस्ट, २०१५ रोजी झाला होता.या करारास राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१५ रोजी मान्यता दिली होती. या करारानुसार वाद निर्माण झाल्यास साखर आयुक्तांनी लवादाची भूमिका पार पाडावी, असे नमूद केलेले आहे.मे. सचिन घायाळ कंपनीने दोन गळीत हंगाम करून नंतरचा गळीत हंगाम केला नाही. यानंतर संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन कारखाना आ. संदीपान भुमरे यांच्याकडून तुषार शिसोदे यांच्या ताब्यात आला.यानंतर कारखाना गळीत हंगाम न करता कारखाना बंद ठेवल्याने करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याने कारखान्यास ७६ कोटी रुपये सचिन घायाळ यांनी भरपाई द्यावी, असा दावा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याकडे दाखल केला होता.याबाबत गेल्या वर्षभरापासून सुनावनी सुरू होती. याबाबत संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी बाजू मांडली की, सचिन घायाळ यांनी गळीत हंगाम करण्यास नकार दिल्याने तालुक्यातील शेतकरी व कारखान्याचे सभासद यांचे नुकसान होणार होते.यामुळे गळीत हंगाम सुरू करावा म्हणून सचिन घायाळ कंपनीकडे पाठपुरावा केला; परंतु त्यांनी दाद न दिल्याने कारखान्याच्या २६ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने सचिन घायाळ कंपनीचा करार रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.करार रद्द करण्याची नोटीस या कंपनीस बजावली. या नोटीसला या कंपनीने उत्तर दिले नाही. यानंतर १० एप्रिल २०१७ रोजी घायाळ कंपनीचा करार रद्द केला.यानंतर आम्ही नाशिक येथील शीला अतुलटेक कंपनीस शेतक-यांचे हित लक्षात घेऊन कारखाना चालविण्याची विनंती केली. या कंपनीने कोट्यवधी रुपये लावून कारखाना चालू केला.कारखाना गळीत हंगामास परवानगी द्यावी यासाठी शासनाकडे अर्ज केला आहे, असेही ते म्हणाले.