शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

‘संत एकनाथ कारखाना’ घायाळ कंपनीला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील शीला अतुलटेक शुगरने कारखाना सुरळीत चालू करून महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच हा कारखाना पुन्हा यापूर्वी करार केलेल्या सचिन घायाळ कंपनीस चालविण्यास द्यावा, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.दरम्यान, साखर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयास तातडीने न्यायालयात आव्हान दिले असून, संत एकनाथ आम्हीच चालवू, असे विद्यमान चेअरमन तुषार शिसोदे यांनी ठामपणे सांगितले आहे.संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मे. सचिन घायाळ कंपनीस २०१४/१५ ला तत्कालीन संचालक मंडळाने पुढील १८ वर्षे चालविण्यासाठी सहभागी तत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. याबाबतचा करार ३ आॅगस्ट, २०१५ रोजी झाला होता.या करारास राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१५ रोजी मान्यता दिली होती. या करारानुसार वाद निर्माण झाल्यास साखर आयुक्तांनी लवादाची भूमिका पार पाडावी, असे नमूद केलेले आहे.मे. सचिन घायाळ कंपनीने दोन गळीत हंगाम करून नंतरचा गळीत हंगाम केला नाही. यानंतर संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन कारखाना आ. संदीपान भुमरे यांच्याकडून तुषार शिसोदे यांच्या ताब्यात आला.यानंतर कारखाना गळीत हंगाम न करता कारखाना बंद ठेवल्याने करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याने कारखान्यास ७६ कोटी रुपये सचिन घायाळ यांनी भरपाई द्यावी, असा दावा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याकडे दाखल केला होता.याबाबत गेल्या वर्षभरापासून सुनावनी सुरू होती. याबाबत संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी बाजू मांडली की, सचिन घायाळ यांनी गळीत हंगाम करण्यास नकार दिल्याने तालुक्यातील शेतकरी व कारखान्याचे सभासद यांचे नुकसान होणार होते.यामुळे गळीत हंगाम सुरू करावा म्हणून सचिन घायाळ कंपनीकडे पाठपुरावा केला; परंतु त्यांनी दाद न दिल्याने कारखान्याच्या २६ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने सचिन घायाळ कंपनीचा करार रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.करार रद्द करण्याची नोटीस या कंपनीस बजावली. या नोटीसला या कंपनीने उत्तर दिले नाही. यानंतर १० एप्रिल २०१७ रोजी घायाळ कंपनीचा करार रद्द केला.यानंतर आम्ही नाशिक येथील शीला अतुलटेक कंपनीस शेतक-यांचे हित लक्षात घेऊन कारखाना चालविण्याची विनंती केली. या कंपनीने कोट्यवधी रुपये लावून कारखाना चालू केला.कारखाना गळीत हंगामास परवानगी द्यावी यासाठी शासनाकडे अर्ज केला आहे, असेही ते म्हणाले.