शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मृगाने दिला दगा, आर्द्रातही ढगांकडे बघा...

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ मृग नक्षत्रात झालेल्या सरासरी ५० मि.मी. पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात मान्सून वेळेवर आला.

एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळमृग नक्षत्रात झालेल्या सरासरी ५० मि.मी. पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात मान्सून वेळेवर आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्साहात खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली, परंतु गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला. तालुक्यात झालेला पाऊस अवकाळी होता, याची आता जाणीव झाल्याने ‘मृगाने दिला दगा, आता आर्द्रातही ढगांकडे बघा’ असेच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर ‘पावसाळ्यात उन्हाळा अन् उन्हाळ्यात पावसाळा’ झाल्याने ऋतुचक्र बदलले की काय? अशी चर्चा शेतकऱ्यांतून केली जात आहे़मार्च महिन्यात सलग अठरा दिवस गारपीट झाली. त्यामुळे तालुक्यातील ४८ गावांतील रबी पिकांना फटका बसला़ एवढेच नव्हे, तर एप्रिल आणि मे महिन्यातसुध्दा तीन-चार वेळा मोठा वादळी पाऊस झाला़ विजा कोसळून अनेक गावांतील शेतकऱ्यांचे पशुधन दगावले़ परिणामी, उन्हाळ्यात पावसाळा अन् पावसाळ्यात उन्हाळा असेच वातावरण निर्माण झाले असल्याने ऋतुचक्र्र बदलले की काय, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू झाली आहे़ त्यामुळे ऋतुचक्राचा अभ्यास करून संशोधन होणे गरजेचे आहे, अशी मागणीसुध्दा शेतकऱ्यांतून होत आहे़ मृग नक्षत्रात मान्सून वेळेवर येणार, अशी घोषणा सुरुवातीला हवामान खात्यासह पंचांगकर्त्यांनीही केली होती़ शिवाय चालू वर्षात समाधानकारक पाऊस होणार असल्याचेही सांगण्यात आले़ त्यातच मृग नक्षत्राच्या शेवटी तालुक्यात सरासरी ५० मि.मी. पाऊस झाला़ त्यामुळे दैठणा, येरोळ, सुमठाणा, शिरूर अनंतपाळ, साकोळ, तळेगाव, शेंद, तिपराळ, नागेवाडी, हणमंतवाडी, आनंदवाडी, तुरूकवाडी, रापका, लक्कडजवळगा, जोगाळा आदी निम्म्या तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला़ महागामोलाचे खते-बियाणे घालून ते उगवण्याची प्रतीक्षा करत आहेत़ पेरण्या होऊन आठ दिवस उलटले तरीही अनेकांचे बियाणे उगवलेच नाही़ त्यामुळे तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे़ पाऊस पडत नसल्याने फारशी माहिती नसूनही हवामानावर आधारित पीक विमा भरण्यासाठी शेतकरी सरसावल्याचे चित्र दिसत आहे.एकरी सहा हजार खर्च...तीन हजाराची सोयाबीन बॅग, तेराशेचा खत, एक हजार पेरणीचा खर्च आणि एक हजारांचे मजूर असा एकंदर एकरी सहा हजारापेक्षा अधिक खर्च शेतकऱ्यांचा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून, दुबार पेरणी कशी करायची, या विंवचनेत दिसत आहेत़तर पंचनामे करा... जून महिना संपला तरीही पाऊस पडत नसल्याने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून दुबार पेरणीसाठी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी एकरी दहा हजाराची मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे़