शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

By admin | Updated: January 22, 2015 00:43 IST

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नापिकीने बळीराजा हैराण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळग्रस्तांना मतद द्यावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत हे सरकार उद्योगपती धार्जिणे असल्याचा आरोप केला. जिल्ह्यामध्ये सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हाती लागले नाही. आणि रबीचीही शाश्वती नाही. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळग्रस्तांसाठी मदत द्यावी, या मागणीसाठी बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण यांनी शेतकरी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत असताना शासन मात्र, ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. याप्रसंगी अन्य पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. त्यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आंदोलनामध्ये जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, विश्वास शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, सभापती बाबूराव राठोड, प्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य दीपक जवळगे, प्रशांत चेडे, समीयोद्दीन मशायक, राजेंद्र शेरखाने, सुभाषसिंह सद्दीवाल, विलास शाळू, लक्ष्मण सरडे, सय्यद इकबाल, संग्राम मुंडे, प्रकाश आष्टे, अ‍ॅड. दर्शन कोळगे, विनोद वीर, शिवाजी चौगुले, अ‍ॅड. दर्शन कोळगे, सुरेश जगताप, पटेल महेबुबपाशा याकुब, नितीन बागल, विजयकुमार सोनवणे व पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)