शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पीककर्जासाठी हस्तलिखित सातबारा शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: May 10, 2016 00:56 IST

औरंगाबाद : ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सातबारा आॅनलाईन करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे; परंतु आॅनलाईन सातबारामध्ये अनेक चुका झाल्याचे आढळून आल्यामुळे

औरंगाबाद : ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सातबारा आॅनलाईन करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे; परंतु आॅनलाईन सातबारामध्ये अनेक चुका झाल्याचे आढळून आल्यामुळे खरीप पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत हस्तलिखित सातबारा-उतारा देण्याची परवानगी दिली आहे. तसेच मूळ सातबारा आॅनलाईन सातबाऱ्याशी तंतोतंत जुळविण्याकरिता चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याप्रकरणी महसूल व वन विभागाने परिपत्रक काढले आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या आॅनलाईन सातबारा मोहिमेत ४० टक्क्यांहून अधिक चुका झाल्या असल्याचे आढळून आले आहे. नावांमधील चुका, शेती क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. एनआयसीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सातबाऱ्यातील नोंदी दुरुस्त करण्याचा कोणताही पर्याय नसल्यामुळे नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जाण्याचा धोका निर्माण झाला. तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या संपात आॅनलाईन सातबारा दुरुस्तीसाठी सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी होती. एनआयसीमध्ये एडिट मोड्युल विकसित केले असून त्याद्वारे सातबाऱ्यातील चुका दुरुस्त केल्या जाणार आहे. तलाठ्यांच्या संगणकात ई-फेरफार प्रणालीत एडिट मोड्युलची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. फक्त सर्व्हे क्रमांक आणि गटक्रमांक दुरुस्त करताना बदलता येणार नाही. या दुरुस्त्या तात्पुरत्या डाटाबेसमध्ये संरक्षित होतील, तलाठ्यांनी या सूचीवर स्वाक्षरी करून ती संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना सादर करावी. मंडळ अधिकाऱ्यांनी खात्री करून त्यावर स्वाक्षरी करावी व मान्यतेसाठी तहसीलदारांकडे सादर करावे. तहसीलदारांनी स्वाक्षरी करून तात्पुरत्या दुरुस्त्या आॅनलाईन सातबाऱ्यामध्ये अंतिम करण्यास मान्यता द्यावी. त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. या कार्यप्रणालीवर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी नियंत्रण ठेवून आॅनलाईन गाव नमुना नंबर, सातबारे तंतोतंत हस्तलिखित सातबाऱ्याशी जुळतील याची ३० सप्टेंबरपर्यंत तपासणी करून अंतिम करावे.