शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बाजारभावाच्या चारपट दर द्या..!

By admin | Updated: June 9, 2017 01:00 IST

जालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने भौगोलिकप्रदेश, कोरडवाहू, बागायती, असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना प्रचलित बाजारभावाच्या चार पट मोबदला द्यावा. अन्यथा समृद्धी महामार्गास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.नियोजित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका लोकप्रतिनिधींना कळावी यासाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीस राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ.राजेश टोपे, अण्णा सावंत, शेतकरी हक्क व कृती समितीचे, प्रशांत गाढे, राम सावंत, देविदास जिगे, प्रशांत वाढेकर, भाऊसाहेब घुगे, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. संजय काळाबांडे, विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती.समृद्धी महामार्गात बागायत जमीन जाणार असल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र, तुलनेत शासन देत असलेला मोबदला अत्यंत कमी आहे. त्यामुळे बैठकीस उपस्थित बदनापूर व जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गास जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला. आ. टोपे म्हणाले की, महामार्गात जमीन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दीड कोटी आणि दुसऱ्याला पंधरा लाख रुपये मोबदला निश्चित करणे, हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांचा महामार्गास विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे हित जोपासण्याचे काम करू. महामार्गाबाबत राज्यातील शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे सोमवारी औरंगाबादला बैठक घेणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे टोपे म्हणाले. अण्णा सावंत म्हणाले, की नागपूर- मुंबईला जोडण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून समृद्धी महामार्ग बांधून घ्यायचा आणि विदर्भ वेगळा करायचा शासनाचा डाव आहे. कर्ज काढून महामार्ग बांधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. बैठकीस गेंदालाल झुंगे, प्रकाश कान्हेरे, उध्दव गिते, चंद्रकांत क्षीरसागर, उदय काकडे, संतोष गाजरे, भास्कर वाढेकर, विठ्ठल टेकाळे, शाम लांडगे, राजेंद्र काकडे, अंबादास गिते, शेख रशीद यांच्यासह बदनापूर व जालना तालुक्यातील पंचवीस गावांतील शेतकरी उपस्थित होते.