शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

बाजारभावाच्या चारपट दर द्या..!

By admin | Updated: June 9, 2017 01:00 IST

जालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने भौगोलिकप्रदेश, कोरडवाहू, बागायती, असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना प्रचलित बाजारभावाच्या चार पट मोबदला द्यावा. अन्यथा समृद्धी महामार्गास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.नियोजित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका लोकप्रतिनिधींना कळावी यासाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीस राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ.राजेश टोपे, अण्णा सावंत, शेतकरी हक्क व कृती समितीचे, प्रशांत गाढे, राम सावंत, देविदास जिगे, प्रशांत वाढेकर, भाऊसाहेब घुगे, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. संजय काळाबांडे, विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती.समृद्धी महामार्गात बागायत जमीन जाणार असल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र, तुलनेत शासन देत असलेला मोबदला अत्यंत कमी आहे. त्यामुळे बैठकीस उपस्थित बदनापूर व जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गास जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला. आ. टोपे म्हणाले की, महामार्गात जमीन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दीड कोटी आणि दुसऱ्याला पंधरा लाख रुपये मोबदला निश्चित करणे, हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांचा महामार्गास विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे हित जोपासण्याचे काम करू. महामार्गाबाबत राज्यातील शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे सोमवारी औरंगाबादला बैठक घेणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे टोपे म्हणाले. अण्णा सावंत म्हणाले, की नागपूर- मुंबईला जोडण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून समृद्धी महामार्ग बांधून घ्यायचा आणि विदर्भ वेगळा करायचा शासनाचा डाव आहे. कर्ज काढून महामार्ग बांधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. बैठकीस गेंदालाल झुंगे, प्रकाश कान्हेरे, उध्दव गिते, चंद्रकांत क्षीरसागर, उदय काकडे, संतोष गाजरे, भास्कर वाढेकर, विठ्ठल टेकाळे, शाम लांडगे, राजेंद्र काकडे, अंबादास गिते, शेख रशीद यांच्यासह बदनापूर व जालना तालुक्यातील पंचवीस गावांतील शेतकरी उपस्थित होते.