शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावाच्या चारपट दर द्या..!

By admin | Updated: June 9, 2017 01:00 IST

जालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने भौगोलिकप्रदेश, कोरडवाहू, बागायती, असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना प्रचलित बाजारभावाच्या चार पट मोबदला द्यावा. अन्यथा समृद्धी महामार्गास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.नियोजित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका लोकप्रतिनिधींना कळावी यासाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीस राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ.राजेश टोपे, अण्णा सावंत, शेतकरी हक्क व कृती समितीचे, प्रशांत गाढे, राम सावंत, देविदास जिगे, प्रशांत वाढेकर, भाऊसाहेब घुगे, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. संजय काळाबांडे, विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती.समृद्धी महामार्गात बागायत जमीन जाणार असल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र, तुलनेत शासन देत असलेला मोबदला अत्यंत कमी आहे. त्यामुळे बैठकीस उपस्थित बदनापूर व जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गास जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला. आ. टोपे म्हणाले की, महामार्गात जमीन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दीड कोटी आणि दुसऱ्याला पंधरा लाख रुपये मोबदला निश्चित करणे, हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांचा महामार्गास विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे हित जोपासण्याचे काम करू. महामार्गाबाबत राज्यातील शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे सोमवारी औरंगाबादला बैठक घेणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे टोपे म्हणाले. अण्णा सावंत म्हणाले, की नागपूर- मुंबईला जोडण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून समृद्धी महामार्ग बांधून घ्यायचा आणि विदर्भ वेगळा करायचा शासनाचा डाव आहे. कर्ज काढून महामार्ग बांधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. बैठकीस गेंदालाल झुंगे, प्रकाश कान्हेरे, उध्दव गिते, चंद्रकांत क्षीरसागर, उदय काकडे, संतोष गाजरे, भास्कर वाढेकर, विठ्ठल टेकाळे, शाम लांडगे, राजेंद्र काकडे, अंबादास गिते, शेख रशीद यांच्यासह बदनापूर व जालना तालुक्यातील पंचवीस गावांतील शेतकरी उपस्थित होते.