शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

रखडलेले वेतनेतर अनुदान द्या अन्यथा अवमान याचिका दाखल करु

By | Updated: December 5, 2020 04:08 IST

औरंगाबाद - शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून वेतनेतर अनुदान दिले नाही. न्यायालयाचा निर्णय असताना हे अनुदान रखडले आहे. त्यामुळे ...

औरंगाबाद - शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून वेतनेतर अनुदान दिले नाही. न्यायालयाचा निर्णय असताना हे अनुदान रखडले आहे. त्यामुळे शाळा सुरु करताना शिक्षण संस्था अडचणीत सापडल्या आहेत. राज्य शासनाने शाळा सुरु करताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संंस्था महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आता शिक्षण संस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवा अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल करु, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

नवल पाटील म्हणाले, इंग्रजी शाळेचे अडीच वर्षांचे आरटीई प्रवेशाची परिपूर्ती न मिळाल्याने शाळांना फटका बसला आहे. विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढण्याला ११ वर्षे झाली. तरी देखील विनाअनुदानित तत्वावर काम करणारे शिक्षक पगारापासून वंचित आहे. १६२८ शाळा व २५० तुकड्यांना प्रचलित पगारी अनुदान मिळणे बाकी आहे. शिवाय अनेक शाळा अद्याप अघोषित आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासन मान्यता देत नसल्याने शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त शाळेची इतर कामांची जबाबदारी संभाळावी लागते. २००५ पूर्वी पावणे दोन लाख शिक्षकेतर कर्मचारी होते. आज फक्त ७५ हजार कर्मचारी आहेत. या रिक्त जागा भरा. मोडकळीस आलेल्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. नव्या केंद्राच्या धोरणानुसार सहावी व सातवीचे वर्ग माध्यमिक शाळांना तर चाैथीला पाचवीचा वर्ग जोडला जावा. शालार्थ आयडी देतांना होत असलेला भ्रष्टाचार थांबवा. आमची शाळा आमची जबाबदारी शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक चालवतील, विद्यार्थ्यांची काळजी घेतील त्यामुळे पालकांनी शाळेतील सुरक्षिततेची काळजी करु नका, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला सरचिटणीस एस.पी. जवळकर, विभागीय अध्यक्ष मिलिंद पाटील, मिर्झा सलिम बेग, जिल्हाध्यक्ष शिवाजी बनकर पाटील यांची उपस्थिती होती.