शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले वेतनेतर अनुदान द्या अन्यथा अवमान याचिका दाखल करु

By | Updated: December 5, 2020 04:08 IST

औरंगाबाद - शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून वेतनेतर अनुदान दिले नाही. न्यायालयाचा निर्णय असताना हे अनुदान रखडले आहे. त्यामुळे ...

औरंगाबाद - शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून वेतनेतर अनुदान दिले नाही. न्यायालयाचा निर्णय असताना हे अनुदान रखडले आहे. त्यामुळे शाळा सुरु करताना शिक्षण संस्था अडचणीत सापडल्या आहेत. राज्य शासनाने शाळा सुरु करताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संंस्था महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आता शिक्षण संस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवा अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल करु, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

नवल पाटील म्हणाले, इंग्रजी शाळेचे अडीच वर्षांचे आरटीई प्रवेशाची परिपूर्ती न मिळाल्याने शाळांना फटका बसला आहे. विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढण्याला ११ वर्षे झाली. तरी देखील विनाअनुदानित तत्वावर काम करणारे शिक्षक पगारापासून वंचित आहे. १६२८ शाळा व २५० तुकड्यांना प्रचलित पगारी अनुदान मिळणे बाकी आहे. शिवाय अनेक शाळा अद्याप अघोषित आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासन मान्यता देत नसल्याने शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त शाळेची इतर कामांची जबाबदारी संभाळावी लागते. २००५ पूर्वी पावणे दोन लाख शिक्षकेतर कर्मचारी होते. आज फक्त ७५ हजार कर्मचारी आहेत. या रिक्त जागा भरा. मोडकळीस आलेल्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. नव्या केंद्राच्या धोरणानुसार सहावी व सातवीचे वर्ग माध्यमिक शाळांना तर चाैथीला पाचवीचा वर्ग जोडला जावा. शालार्थ आयडी देतांना होत असलेला भ्रष्टाचार थांबवा. आमची शाळा आमची जबाबदारी शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक चालवतील, विद्यार्थ्यांची काळजी घेतील त्यामुळे पालकांनी शाळेतील सुरक्षिततेची काळजी करु नका, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला सरचिटणीस एस.पी. जवळकर, विभागीय अध्यक्ष मिलिंद पाटील, मिर्झा सलिम बेग, जिल्हाध्यक्ष शिवाजी बनकर पाटील यांची उपस्थिती होती.