शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

पुन्हा मुलींचीच बाजी!

By admin | Updated: June 14, 2017 02:20 IST

जिल्ह्याचा एकूण निकाल ८४% : जिल्ह्यात पातूर तालुका अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोठ्या प्रतीक्षेनंतर १३ जून रोजी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला आहे. टक्केवारीत बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीतही मुलींनीच आघाडी घेतली आहे. ८६.५ टक्के प्राप्त करू न पातूर तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. अकोल्याच्या हिंदू ज्ञानपीठची विद्यार्थीनी गायत्री सरोदे हिने ९९.६० टक्के गुण घेऊन अव्वल स्थान पटकाविले आहे तर बाल शिवाजी कॉन्व्हेंटच्या सुरभी देशपांडे व आरोही खोडकुंभे या दोघींनी ९९.२० टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे या तिघींच्या गुणांच्या टक्केवारीमध्ये क्रीडा गुणांचा समावेश नसल्याने त्यांचे यश नेत्रदिपक ठरले आहे. जिल्ह्यातील २८,४१३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षा दिली होती. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११,९९६ मुले तर ११,८७८ मुलींचा समावेश आहे. निकाल जाहीर होताच शहरातील विविध शाळांमधील विद्यर्थ्यांनी जल्लोष केला. भारत विद्यालय, विवेकानंद शाळा व बाल शिवाजी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.जिल्ह्यात यावर्षी पातूर तालुक्याने बाजी मारली असून, तालुक्याचा निकाल ८२.८३ असा लागला आहे. अकोला तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, या तालुक्याचा निकाल हा ८५.०७ टक्के एवढा आहे. बाळापूर निकाल ८४.९९ टक्के, बार्शीटाकळी ८४.९३ टक्के, अकोट ८१.३५ तर तेल्हारा तालुक्याचा निकाल ८०.५१ टक्के एवढा लागला आहे.४,५३९ विद्यार्थी अनुत्तीर्ण जिल्ह्यात एकूण नोंदणीपैकी प्रत्यक्षात २८,४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ४,५३९ विद्यार्थी यावर्षी अनुतीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी १५.९८ एवढी आहे.