शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

घाटीत कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने वर्षभरात झाले सहाशे गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:21 IST

गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही.

औरंगाबाद : गर्भपात म्हटले की, दबक्या आवाजात उल्लेख केला जातो. मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या संशयित नजरेनेही पाहिले जाते; परंतु गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही. कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात केले जातात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात सहाशे गर्भपात होत असल्याचे समोर आले आहे.

अनधिकृत गर्भपात हा समाजासाठी चिंतेचा विषय आहे. यापूर्वी अनेक घटनांतून अवैधरीत्या गर्भपात होत असल्याचा पर्दाफाश झालेला आहे. गर्भलिंग निदान कायद्याचा भंग करून गर्भपाताची दुकानदारी काहींकडून केली जाते. अशांवर आरोग्य विभागाची, पोलीस प्रशासनाची करडी नजर असते. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अनेक कारणांमुळे कायदेशीर, वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात करण्याची वेळ येते. २० आठवड्यांपर्यंत गर्भपात हा कायदेशीर आहे.

काही प्रकरणांत न्यायालयाच्या आदेशानुसार २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. गरोदरपणात सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात व्यंग असल्याचे निदान झाल्यानंतरही तो वाढू दिला तर पुढे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशावेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात होतात. महिन्याला जवळपास ५० गर्भपात एकट्या घाटीत होतात. त्यासाठी आवश्यक ती तपासणी केली जाते.

ही आहेत कारणेअनेकदा गर्भनिरोधक उपाय करूनही गर्भ राहिलेला असतो, तर कधी महिला अत्याचाराची बळी असते. अनेकदा गर्भात काहीतरी दोषही आढळून येतो. त्यामुळे जन्मानंतर बाळात व्यंग राहण्याचा धोका असतो. शिवाय गर्भधारणेचा संबंधित स्त्रीला त्रास होत असेल, तिचा मानसिक छळ होत असेल, तर अशा परिस्थितीत गर्भपाताचा पर्याय निवडला जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

महिन्याला ५० गर्भपातघाटीत महिन्याला जवळपास ५० गर्भपात केले जातात. गर्भपात हे वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि कायदेशीर बाबी पाळून करण्यात येतात, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला