शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घाटीत कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने वर्षभरात झाले सहाशे गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:21 IST

गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही.

औरंगाबाद : गर्भपात म्हटले की, दबक्या आवाजात उल्लेख केला जातो. मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या संशयित नजरेनेही पाहिले जाते; परंतु गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही. कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात केले जातात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात सहाशे गर्भपात होत असल्याचे समोर आले आहे.

अनधिकृत गर्भपात हा समाजासाठी चिंतेचा विषय आहे. यापूर्वी अनेक घटनांतून अवैधरीत्या गर्भपात होत असल्याचा पर्दाफाश झालेला आहे. गर्भलिंग निदान कायद्याचा भंग करून गर्भपाताची दुकानदारी काहींकडून केली जाते. अशांवर आरोग्य विभागाची, पोलीस प्रशासनाची करडी नजर असते. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अनेक कारणांमुळे कायदेशीर, वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात करण्याची वेळ येते. २० आठवड्यांपर्यंत गर्भपात हा कायदेशीर आहे.

काही प्रकरणांत न्यायालयाच्या आदेशानुसार २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. गरोदरपणात सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात व्यंग असल्याचे निदान झाल्यानंतरही तो वाढू दिला तर पुढे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशावेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात होतात. महिन्याला जवळपास ५० गर्भपात एकट्या घाटीत होतात. त्यासाठी आवश्यक ती तपासणी केली जाते.

ही आहेत कारणेअनेकदा गर्भनिरोधक उपाय करूनही गर्भ राहिलेला असतो, तर कधी महिला अत्याचाराची बळी असते. अनेकदा गर्भात काहीतरी दोषही आढळून येतो. त्यामुळे जन्मानंतर बाळात व्यंग राहण्याचा धोका असतो. शिवाय गर्भधारणेचा संबंधित स्त्रीला त्रास होत असेल, तिचा मानसिक छळ होत असेल, तर अशा परिस्थितीत गर्भपाताचा पर्याय निवडला जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

महिन्याला ५० गर्भपातघाटीत महिन्याला जवळपास ५० गर्भपात केले जातात. गर्भपात हे वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि कायदेशीर बाबी पाळून करण्यात येतात, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला