तळणी : रोजगार हमी योजनेतून परिसरात ४३ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र दोन ते तीन वर्षे उलटूनही संबंधित शेतकऱ्यांना याचा मोबदाला मिळालेला नाही. या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संबंधितांनी दिला आहे.तळणी परिसरातील ४३ शेतकऱ्यांनी शेती पाण्याखाली येईल , या आशेवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी कर्ज तसेच सोने गहाण ठेवून काम केले. विहिरीचे काम केल्यावर पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु तब्बल दोन ते तीन वर्षे उलटली तरी अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज कायम आहे. अनुदानासाठी गतवर्षी २३ जुलै रोजी भर पावसात दोन तास लाभधारकांनी रास्ता रोक ो आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने तुटपुंजी मदत दिली. असे असले तरी अनेकाजण या अनुदानापासून वंचित आहेत. दरम्यान, संबंधित विहिरींचे काम पाहणारे तसेच कुशल कामांची देयके सादर करणारे ग्रामविकास अधिकारी बी.बी.चव्हाण यांची बदली झाली. यामुळे ही प्रक्रिया पुन्हा रखडली. यानंतर जी. एस. मुपडे यांनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यांनी मग्रारोहयो कामाचा चार्ज घेतला नाही.तत्कालीन ग्रामविक ास अधिक ारी बी.बी. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर मस्टर ग्रा.पं.मध्येच पडून असल्याचे ग्रा.पं.सदस्य भगवान सरक टे व शेतक री गजानन खरात, सुभाष लाड, प्रेमचंद राठोड, रावसाहेब सरकटे, महादेव चंदेल, विलास तवर, युनूस बागवान, उद्धव सदावर्ते, कै लास पंजरक र यांनी सांगितले. मंठ्याचे गटविकास अधिकारी अनिल सिरसाट म्हणाले. मस्टरचे मूल्यांकन झालेले असून ते मान्यतेसाठी आयुक्त नरेगाक डे पाठविण्यात आलेले आहे. मान्यतेनंतर अनुदान वाटप होईल. (वार्ताहर)कुशल कामाची देयके सादर येथील ४३ सिंचन विहिरींचे क ामे पूर्ण क रण्यात आली असून अकु शल कामाची देयके ग्रा.पं.ने यापूर्वीच पं.स.क डे सादर के लेली आहे.
विहिरींचे अनुदान मिळेना
By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST