शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

नव्याने अनुदान मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:57 IST

राज्य आणि केंद्र शासनाने मागील वर्षी केलेल्या घोषणांपैकी काही टप्प्यांतील अनुदान वर्ष २०१८ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सरकारच्या गंगाजळीच्या आधारावर औरंगाबादची आर्थिक उलाढाल अवलंबून राहणार आहे. नव्याने खूप काही पदरात पडेल, अशी शक्यता सध्या तरी धुसर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य आणि केंद्र शासनाने मागील वर्षी केलेल्या घोषणांपैकी काही टप्प्यांतील अनुदान वर्ष २०१८ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सरकारच्या गंगाजळीच्या आधारावर औरंगाबादची आर्थिक उलाढाल अवलंबून राहणार आहे. नव्याने खूप काही पदरात पडेल, अशी शक्यता सध्या तरी धुसर आहे.शहराची चोहोबाजूने कोंडी होत असून, प्रगतीची चाके मंदावल्याने शहर पिछाडीवर गेले. नवीन वर्षात त्याला कशी चालना मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर वर्ष २०१७ मध्ये बाजारपेठ मंदावलेली राहिली. त्या बाजारपेठेला पूर्वपदावर येण्यासाठी शासनाकडून औद्योगिक, पायाभूत क्षेत्राला काय मिळणार, याकडे सर्व क्षेत्राचे लक्ष आहे.समृद्धी महामार्ग भूसंपादनातून १३६ गावांत होणाºया १२०० हेक्टरसाठी सुमारे १५०० कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून जिल्ह्यात येतील. ती सर्व रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येईल. आजवर ३७० कोटी रुपये समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.२१७ साठी १०२ कोटी रुपये भूसंपादनापोटी देण्याचे काम नवीन वर्षात पूर्णत्वाकडे जाईल.दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल कॉरिडॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी दोन टप्प्यांत सुमारे २२०० कोटींचे नियोजन असून, त्यातील ५० टक्के रक्कम यावर्षी औरंगाबादच्या बाजारपेठेत खेळेल. विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी सक्षमतेने निर्णय झाला, तर ६०० कोटी रुपये भूसंपादनासाठी लागतील. महापालिकेला १०० कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून नवीन वर्षात टप्प्याटप्याने मिळेल. झालर क्षेत्र विकास आराखड्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोने काम सुरू केले, तर पायाभूत सुविधा विकासासाठी लागणारे सुमारे ७ हजार कोटी रुपये किमान पाच टप्प्यांत देण्याबाबत विचार होईल. औरंगाबाद मेट्रोपॉलिटियन प्रादेशिक विकास प्राधिकरण अथवा सिडकोपैकी एका संस्थेकडे ही जबाबदारी जाईल. त्याचा निर्णय नवीन वर्षात होणे शक्य आहे. ७६ कोटी रुपयांचा तातडीचा निधी शहर व जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी देण्यात आला आहे. हा निधी मार्चअखेरपर्यंत येईल.सरकारी गुंतवणुकीवर उलाढालवर्षभरापासून जिल्ह्याच्या बाजारपेठेत आर्थिक गुंतवणुकीने उभारी घेतलेली नाही, त्यामुळे उलाढाल ठप्प आहे. नव्याने येणारा सरकारी गुंतवणुकीचा पैसाच जिल्ह्यात येणार आहे.च्भूसंपादन, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तो पैसा येईल. औद्योगिक गुंतवणुकीचा वेग मंदावला आहे. विमान कनेक्टिव्हिटी कमी होत आहे. उद्योगांची उलाढाल कमी झाली आहे. याचा परिणाम शहर पिछाडीवर जात आहे.