शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

नव्याने अनुदान मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:57 IST

राज्य आणि केंद्र शासनाने मागील वर्षी केलेल्या घोषणांपैकी काही टप्प्यांतील अनुदान वर्ष २०१८ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सरकारच्या गंगाजळीच्या आधारावर औरंगाबादची आर्थिक उलाढाल अवलंबून राहणार आहे. नव्याने खूप काही पदरात पडेल, अशी शक्यता सध्या तरी धुसर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य आणि केंद्र शासनाने मागील वर्षी केलेल्या घोषणांपैकी काही टप्प्यांतील अनुदान वर्ष २०१८ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सरकारच्या गंगाजळीच्या आधारावर औरंगाबादची आर्थिक उलाढाल अवलंबून राहणार आहे. नव्याने खूप काही पदरात पडेल, अशी शक्यता सध्या तरी धुसर आहे.शहराची चोहोबाजूने कोंडी होत असून, प्रगतीची चाके मंदावल्याने शहर पिछाडीवर गेले. नवीन वर्षात त्याला कशी चालना मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर वर्ष २०१७ मध्ये बाजारपेठ मंदावलेली राहिली. त्या बाजारपेठेला पूर्वपदावर येण्यासाठी शासनाकडून औद्योगिक, पायाभूत क्षेत्राला काय मिळणार, याकडे सर्व क्षेत्राचे लक्ष आहे.समृद्धी महामार्ग भूसंपादनातून १३६ गावांत होणाºया १२०० हेक्टरसाठी सुमारे १५०० कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून जिल्ह्यात येतील. ती सर्व रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येईल. आजवर ३७० कोटी रुपये समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.२१७ साठी १०२ कोटी रुपये भूसंपादनापोटी देण्याचे काम नवीन वर्षात पूर्णत्वाकडे जाईल.दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल कॉरिडॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी दोन टप्प्यांत सुमारे २२०० कोटींचे नियोजन असून, त्यातील ५० टक्के रक्कम यावर्षी औरंगाबादच्या बाजारपेठेत खेळेल. विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी सक्षमतेने निर्णय झाला, तर ६०० कोटी रुपये भूसंपादनासाठी लागतील. महापालिकेला १०० कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून नवीन वर्षात टप्प्याटप्याने मिळेल. झालर क्षेत्र विकास आराखड्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोने काम सुरू केले, तर पायाभूत सुविधा विकासासाठी लागणारे सुमारे ७ हजार कोटी रुपये किमान पाच टप्प्यांत देण्याबाबत विचार होईल. औरंगाबाद मेट्रोपॉलिटियन प्रादेशिक विकास प्राधिकरण अथवा सिडकोपैकी एका संस्थेकडे ही जबाबदारी जाईल. त्याचा निर्णय नवीन वर्षात होणे शक्य आहे. ७६ कोटी रुपयांचा तातडीचा निधी शहर व जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी देण्यात आला आहे. हा निधी मार्चअखेरपर्यंत येईल.सरकारी गुंतवणुकीवर उलाढालवर्षभरापासून जिल्ह्याच्या बाजारपेठेत आर्थिक गुंतवणुकीने उभारी घेतलेली नाही, त्यामुळे उलाढाल ठप्प आहे. नव्याने येणारा सरकारी गुंतवणुकीचा पैसाच जिल्ह्यात येणार आहे.च्भूसंपादन, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तो पैसा येईल. औद्योगिक गुंतवणुकीचा वेग मंदावला आहे. विमान कनेक्टिव्हिटी कमी होत आहे. उद्योगांची उलाढाल कमी झाली आहे. याचा परिणाम शहर पिछाडीवर जात आहे.