शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

चारा छावण्यांसाठी प्रतिसाद मिळेना

By admin | Updated: July 29, 2015 00:49 IST

लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाई बरोबर तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे आहे ते पशुधन कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे़

लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाई बरोबर तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे आहे ते पशुधन कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे़ दरम्यान, जिल्हा प्रशासनाने चारा छावण्या सुरु करण्यासाठी सहकारी संस्थांसह बाजार समित्या व सेवाभावी संस्थांना गळ घातली आहे़ मात्र, अद्याप एकाही संस्थेने प्रतिसाद दिला नाही़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पाऊस कमी झाला आहे़ यंदा तर पावसाळ्याचे दोन महिने उलटत आहेत़ परंतु पाऊस झाला नाही़ मृग नक्षत्रात थोडा पाऊस झाला होता़ त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या़ मात्र त्यानंतर पावसाने ताण दिला आहे़ पेरलेल्या पिकावरही नांगर शेतकऱ्यांनी फिरवलेला आहे़ यंदाचा खरीप हंगामच उद्ध्वस्त झाला आहे़ प्यायलाही पाणी नाही, अशा स्थितीत पशुधनाला कसे जगवावे, असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी संस्था, सेवाभावी संस्था यांना आवाहन केले होते़ जिल्ह्यातील तहसीलदारांकडे व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे सुचित केले होते़ किमान ३०० जनावरांच्या चाऱ्याची, पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था होईल, असे ठिकाण निवडून प्रस्ताव सादर करावेत, अशी गळ सदर संस्थांना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घातली होती़ मात्र त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेने प्रतिसाद दिलेला नाही़ लातूर जिल्ह्यात अनेक मोठमोठे सहकारी साखर कारखाने आहेत़ सहकारी संस्थाही मोठ्या आहेत़ परंतू त्यातील एकाही संस्थांना मुक्या जनावरांची किव आलेली नाही़ विशेष म्हणजे प्रस्ताव दाखल केल्यानंर वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत संबंधीत संस्थेला आर्थिक मदत देण्याचे नियोजन आहे़ तरीही एकाही संस्थेने बांधीलकी पत्करली नाही़ कृषी कार्यालयाच्या वतीने १० हजार हेक्टरवर वैरणीचे नियोजन केले आहे़ शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे़ त्यासाठी कृषी विभागामार्फत मका बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे़ परंतु मका पेरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी नाही़ अल्प पाण्यात हा चारा जरी येत असला तरी तेवढेही पाणी नसल्याने शेतकऱ्यांनेही अद्याप वैरण विकास कार्यक्रमांतर्गत मका बियाणाची मागणी केलेली नाही़ ऊस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी तीन ते चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ऊस उत्पादक संघ स्थापन करावा़ जेणेकरुन चारा टंचाईवर मात करता येईल, अशा शेतकऱ्यांनी संघामार्फत चारा छावणीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश होते़ परंतू ऊस उत्पादक शेतकऱ्यांनेही चारा छावण्यासाठी संघ स्थापन केला नाही़ (प्रतिनिधी)