शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डिस्चार्ज झालेल्या रुग्णांकडून फिडबॅक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उपचार क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करावी, वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त खाटा उपलब्ध ठेवाव्यात, कोरोनाच्या ...

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उपचार क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करावी, वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त खाटा उपलब्ध ठेवाव्यात, कोरोनाच्या रुग्णांचे व्यवस्थापन चोखरित्या करावे, तसेच उपचार घेऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांकडून फिडबॅक घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी केल्या.

चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील उपलब्ध उपचार सुविधांचा आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. कमलाकर मुदखेडकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांची उपस्थिती होती. रुग्ण दाखल करताना एसओपीनुसार त्या रुग्णास कोणत्या पद्धतीच्या उपचाराची गरज आहे, हे वैद्यकीयरित्या तपासून त्या पद्धतीने सहकार्य करावे. लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेल्यांना सीसीसीमध्ये पाठवून, उपचारांची जास्त गरज असलेल्या रुग्णांसाठी मिनी घाटीतील खाटा उपलब्ध होतील, याची खबरदारी घ्यावी. एकूण खाटा, आयसीयु खाटा, रिक्त खाटा याबाबतची अद्ययावत माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावी. जे रुग्ण अपेक्षेपेक्षा कमी कालावधित बरे होतील, त्यांना गरजेनुसार राज्य कामगार आरोग्य केंद्रात, सीसीसीमध्ये पाठवावे. कोरोना रुग्णांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांना बोलण्याची सुविधा उपलब्ध ठेवावी.

स्वामी विवेकानंदनगर, मुकुंदवाडीत भूमिपूजन

औरंगाबाद : स्वामी विवेकानंद प्रभागात आ. अंबादास दानवे यांनी दिलेल्या १५ लाख रुपये निधीतून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्या रस्त्याचे भूमिपूजन आ. प्रदीप जैस्वाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. दानवे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गोपाल कुलकर्णी, गणपत खरात, सुरेश कर्डिले, मोहन मेघावाले, किशोर नागरे यांची उपस्थिती होती. तसेच ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी येथे २५ लाख रुपयांतून होणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. शहरप्रमुख बाबासाहेब डांगे, बन्सीलाल गांगवे, दामोधर शिंदे, मनोज गांगवे, सदाशिव पपुलवाड, मनोज बोरा, ज्ञानेश्वर डांगे आदींची यावेळी उपस्थिती होती.

३० मार्च ते ३ एप्रिलदरम्यान व्यवहार बंद

औरंगाबाद : पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारात ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधित पुस्तके, कागदाची भांडार स्तरावर साठा मोजणी होणार आहे. त्यामुळे मंडळाचे औरंगाबाद, लातूरसह उर्वरित सर्व विभागीय ठिकाणांचे व्यवहार बंद राहतील, असे भांडार व्यवस्थापक व्ही. एल. पडघान यांनी कळविले आहे.