शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

परीक्षा केंद्र मिळविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:04 IST

शिक्षण : बोर्डात परीक्षेच्या तयारीची लगबग औरंगाबाद : दहावी आणि बारावीच्या आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी ४० शाळांनी परीक्षा केंद्राची मागणी ...

शिक्षण : बोर्डात परीक्षेच्या तयारीची लगबग

औरंगाबाद : दहावी आणि बारावीच्या आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी ४० शाळांनी परीक्षा केंद्राची मागणी केली आहे. त्यासंदर्भात ४० प्रस्ताव बोर्डाकडे दाखल झाल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या विभागीय मंडळाकडून देण्यात आली.

कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याने आणि अद्यापही नव्या शैक्षणिक सत्रांची स्पष्टता शिक्षण विभागाकडून झालेली नाही. दरवर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चदरम्यान होतात. मात्र, यंदा या परीक्षा एप्रिल- मेदरम्यान होण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करत आहेत. तरीही अभ्यासक्रम कपातीसंदर्भातील संभ्रम कायम आहे. तसेच बोर्डाकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नसंच निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनासंदर्भातच्या दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करीत परीक्षा घेण्याचे नियोजन राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी जास्त परीक्षा केंद्रांची व सुविधांची आवश्यकता भासणार आहे. गेल्यावर्षी दहावीची अडीचशेहून अधिक, तर बारावीची साडेतीनशेच्या जवळपास परीक्षा केंद्रे जिल्ह्यात होती. यावर्षी त्यात भर पडणार आहे. नव्याने ४० शाळांकडून परीक्षा केंद्राची मागणी झालेली आहे. यासाठी शाळेतील दहावी व बारावीचे वर्ग सलग ३ वर्षे सुरू असणे गरजेचे असते. याशिवाय दाखल प्रस्तावांपैकी त्या शाळेतील जागेची पाहणी करणे, इमारत, सुरक्षितता, आसन व्यवस्था, क्षमता या निकषांच्या विचाराअंती परीक्षा केंद्रांना परवानगी दिली जाईल, असे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.