शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र मिळेना; विम्यासाठी अडचण

By admin | Updated: August 11, 2014 00:25 IST

कुरूंदा : पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून राज्य शासनाने पीक विमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी बँकेत विमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत.

कुरूंदा : पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून राज्य शासनाने पीक विमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी बँकेत विमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. परंतु दुबार पेरणीचे प्रमाणपत्रे दिल्याशिवाय बँकेकडून पीक विमा स्विकारला जात नाही. हे प्रमाणपत्र कृषी व महसूल प्रशासन देण्यास तयार नसल्याने पीक विम्याची मुदतवाढीची घोषणा फसवी असल्याची शेतकऱ्यांची भावना बनली आहे.वसमत तालुक्यातीलकुरूंदा परिसरात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर दोन वेळेस पेरणी करण्याचे संकट ओढवले होते. पावसाअभावी शेतीची परिस्थिती बिकट बनल्याने पीक हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारीपणातून पेरणी केल्यानंतर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. राज्य शासनाने पिकविमा भरण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली. यासाठी जाचक अटी लागू केल्याने दुबार पेरणीचे प्रमाणपत्र लावणे गरजेचे बनले आहे. परंतु दुबार पेरणी प्रमाणपत्र जोडल्याशिवाय मध्यवर्ती बँक पीकविम्याचा अर्ज स्विकारण्यास तयार नाही. तशा प्रकारचा लेखी आदेश परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आल्याचे कुरूंदा येथील शाखेतून सांगण्यात आले. यासंबंधी मंडळ अधिकारी अंभोरे यांना विचारले असता, कृषी अधिकारी हेच दुबार पेरणीचे निकष ठरवितात. त्यांच्याकडून अगोदर दुबार पेरणीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच तलाठी प्रमाणपत्र देतील, असे त्यांनी सांगितले. तलाठी आर.डी. राऊत यांनीही असेच सांगितले आहे. या बाबत तालुका कृषी अधिकारी कदम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल आऊट आॅफ रेंज होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. सध्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या प्रमाणपत्रासाठी हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. कोणालाच कार्यालयातून दुबार पेरणीचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याने पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. राज्य शासनाने नव्याने पीक विमा भरण्यास मुदतवाढ देऊन देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. फसव्या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्र्रकरणाकडे नुतन जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)