शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

प्रमाणपत्र मिळेना; विम्यासाठी अडचण

By admin | Updated: August 11, 2014 00:25 IST

कुरूंदा : पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून राज्य शासनाने पीक विमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी बँकेत विमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत.

कुरूंदा : पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून राज्य शासनाने पीक विमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी बँकेत विमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. परंतु दुबार पेरणीचे प्रमाणपत्रे दिल्याशिवाय बँकेकडून पीक विमा स्विकारला जात नाही. हे प्रमाणपत्र कृषी व महसूल प्रशासन देण्यास तयार नसल्याने पीक विम्याची मुदतवाढीची घोषणा फसवी असल्याची शेतकऱ्यांची भावना बनली आहे.वसमत तालुक्यातीलकुरूंदा परिसरात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर दोन वेळेस पेरणी करण्याचे संकट ओढवले होते. पावसाअभावी शेतीची परिस्थिती बिकट बनल्याने पीक हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारीपणातून पेरणी केल्यानंतर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. राज्य शासनाने पिकविमा भरण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली. यासाठी जाचक अटी लागू केल्याने दुबार पेरणीचे प्रमाणपत्र लावणे गरजेचे बनले आहे. परंतु दुबार पेरणी प्रमाणपत्र जोडल्याशिवाय मध्यवर्ती बँक पीकविम्याचा अर्ज स्विकारण्यास तयार नाही. तशा प्रकारचा लेखी आदेश परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आल्याचे कुरूंदा येथील शाखेतून सांगण्यात आले. यासंबंधी मंडळ अधिकारी अंभोरे यांना विचारले असता, कृषी अधिकारी हेच दुबार पेरणीचे निकष ठरवितात. त्यांच्याकडून अगोदर दुबार पेरणीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच तलाठी प्रमाणपत्र देतील, असे त्यांनी सांगितले. तलाठी आर.डी. राऊत यांनीही असेच सांगितले आहे. या बाबत तालुका कृषी अधिकारी कदम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल आऊट आॅफ रेंज होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. सध्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या प्रमाणपत्रासाठी हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. कोणालाच कार्यालयातून दुबार पेरणीचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याने पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. राज्य शासनाने नव्याने पीक विमा भरण्यास मुदतवाढ देऊन देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. फसव्या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्र्रकरणाकडे नुतन जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)