शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

शेतकऱ्याने दोन हजार रुपये दिले तरच होते जिओ टॅगिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात तांत्रिक अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. रोजगार हमी योजनेतून वृक्ष, फळबाग लागवडीच्या योजनेत कार्यारंभ आदेश ...

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात तांत्रिक अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. रोजगार हमी योजनेतून वृक्ष, फळबाग लागवडीच्या योजनेत कार्यारंभ आदेश निघून जिओ टॅगिंग होत नाही. दोन हजार रुपये दिल्याशिवाय तांत्रिक अधिकारी टॅगिंग करून देत नसल्याचा धक्कादायक प्रकार खुद्द शिवसेनेचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापती किशोर बलांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला. यावेळी फुलंब्रीचे गटविकास अधिकारी व तांत्रिक अधिकाऱ्यांवर कारवाईची सर्व सदस्यांनी मागणी केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायत समिती औरंगाबादच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली. शिवसेनेच्या सभापतींनीच आक्रमकपणे रोहयोतील योजनांच्या अंमलबजावणीतील अडवणूक आणि बोकाळलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, सदस्य शिवाजी पाथ्रीकर, मधुकर वालतुरे, किशोर पवार, रमेश गायकवाड, रमेश पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अडवणुकीचे प्रकार नावासह मांडले.

फुलंब्री तालुक्यातील कंत्राटी तांत्रिक अधिकारी खंदारे आणि गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांच्याकडे वारंवार सांगूनही शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही. वृक्षलागवडीसाठी पेंडगाव येथील शेतकऱ्यांना २६ जूनला कार्यारंभ आदेश मिळाले. अद्याप जिओ टॅगिंग न झाल्याने पावसाळा सुरू होऊन महिना सरला तरी फळबाग लागवड करता आली नाही. खड्ड्यांचे जिओ टॅगिंग करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये द्यावे लागतात. न दिलेल्या शेतकऱ्यांचे टॅगिंग अद्याप झालेले नाही. यासंबंधी जाब विचारल्यावर थेट वरपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याचे अधिकारी सांगत असतील तर कसे होईल, असा उद्विग्न सवाल बलांडे यांनी उपस्थित केला.

---

आजच कारवाई करणार

फुलंब्रीच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आजच कारवाई होईल. याप्रकरणी सर्व आरोपांची चौकशी करून कारवाई करू तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहयोचा कामनिहाय आढावा घेऊन कामाला गती देऊ, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

----

खडाजंगी...

---

(पाॅईंटर)

कंत्राटी तांत्रिक अधिकारी : वरपर्यंत पैसे द्यावे लागतात. सभापतींना सांगा वरपर्यंत लाईन क्लिअर, २ हजार दिल्यावरच होईल काम

बांधकाम सभापती : रोहयो मंत्री याच जिल्ह्याचे, शिवसेनेचे मंत्री, राज्यात, जिल्हा परिषदेतही शिवेसेना सत्तेत, सचिव योजनेसाठी आग्रही, मग पैसे वर पर्यंत म्हणजे कुणा कुणाला द्यावे लागतात. बीडीओंसह कंत्राटी अधिकार्यांवर कारवाई करा.

सर्व सदस्य : पैसे दिले नाही म्हणून मस्टर केले झिरो. अखेर शेतकर्यांनी वृक्ष लागवड केली. आता खड्ड्यांचे जीओ टॅगिंग कसे होईल. शेतकरी कलम आणल्यावर पावसाळा सुरु झाल्यावर थांबणार कसे?

बीडीओ : तांत्रिक अधिकारी वर पर्यंत पैसे द्यावे लागत असल्याचे माझ्यासमोर बोलले. मी चौकशी करुन समज दिली.