शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

प्रतिभा सर्वांकडेच, गरज पैलू पाडण्याची

By admin | Updated: March 15, 2016 00:41 IST

औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.

औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.‘आयपीसीसी’, ‘सीपीटी’ आणि ‘सीए’ अंतिम परीक्षेतील गुणवंतांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार करण्यात आला. ‘लोकमत भवन’ मध्ये झालेल्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संपादक चक्रधर दळवी, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, सहायक उपाध्यक्ष (फायनान्स) शैलेश चांदीवाल, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, व्यवस्थापक (लेखा व वित्त) अंबरिश श्रॉफ, ‘आयसीएआय’च्या पश्चिम विभागाचे सदस्य उमेश शर्मा, औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सीए’ अंतिम परीक्षेतील २२, ‘आयपीसीसी’च्या २४, तर ‘सीपीटी’च्या २०० गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. ‘प्रतिभा ही सर्वांकडेच असते, परंतु त्यावर पैलू पाडण्याची गरज आहे. आपल्याला कोणत्याही विषयातील तज्ज्ञ व्हायचे नाही, तर परीक्षेच्या तीन तासांत समोर येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याची आहे. परीक्षेच्या कालावधीत आपल्यातील प्रतिभेचा योग्य प्रकारे उपयोग करणारे विद्यार्थीच यशस्वी होतात,’ असा मोलाचा सल्ला बकोरिया यांनी दिला. मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारकमनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’ समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची बकोरिया यांची ही पहिलीच वेळ होती.‘लोकमत’ समूहाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. सीए, सीपीटी आणि आयपीसीसी परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांत मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारक आहे. स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता ‘एज्युकेशन हब’ बनण्याची औरंगाबादमध्ये क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कठोर मेहनत आणि आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला ‘सीए’ उमेश शर्मा यांनी दिला. ‘लोकमत’कडून या विद्यार्थ्यांचा गौरव होणे ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. रेणुका देशपांडे यांनीही गुणवंतांचे कौतुक केले. ओमप्रकाश केला यांनी प्रास्ताविक केले. संदीप विष्णोई यांनी आभार मानले.देशाला महासत्ता बनविण्यात चार्टर्ड अकाऊंटंटचा सिंहाचा वाटा असेल, असे गौरवोद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढले. ‘डीएमआयसी’ प्रकल्पामुळे भविष्यात ‘सीएं’ची मोठी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत ‘सीए’ना ‘सोल्युशन प्रोव्हायडर’ म्हणून काम करावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. या अभ्यासक्रमात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.