शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

प्रतिभा सर्वांकडेच, गरज पैलू पाडण्याची

By admin | Updated: March 15, 2016 00:41 IST

औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.

औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.‘आयपीसीसी’, ‘सीपीटी’ आणि ‘सीए’ अंतिम परीक्षेतील गुणवंतांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार करण्यात आला. ‘लोकमत भवन’ मध्ये झालेल्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संपादक चक्रधर दळवी, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, सहायक उपाध्यक्ष (फायनान्स) शैलेश चांदीवाल, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, व्यवस्थापक (लेखा व वित्त) अंबरिश श्रॉफ, ‘आयसीएआय’च्या पश्चिम विभागाचे सदस्य उमेश शर्मा, औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सीए’ अंतिम परीक्षेतील २२, ‘आयपीसीसी’च्या २४, तर ‘सीपीटी’च्या २०० गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. ‘प्रतिभा ही सर्वांकडेच असते, परंतु त्यावर पैलू पाडण्याची गरज आहे. आपल्याला कोणत्याही विषयातील तज्ज्ञ व्हायचे नाही, तर परीक्षेच्या तीन तासांत समोर येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याची आहे. परीक्षेच्या कालावधीत आपल्यातील प्रतिभेचा योग्य प्रकारे उपयोग करणारे विद्यार्थीच यशस्वी होतात,’ असा मोलाचा सल्ला बकोरिया यांनी दिला. मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारकमनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’ समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची बकोरिया यांची ही पहिलीच वेळ होती.‘लोकमत’ समूहाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. सीए, सीपीटी आणि आयपीसीसी परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांत मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारक आहे. स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता ‘एज्युकेशन हब’ बनण्याची औरंगाबादमध्ये क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कठोर मेहनत आणि आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला ‘सीए’ उमेश शर्मा यांनी दिला. ‘लोकमत’कडून या विद्यार्थ्यांचा गौरव होणे ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. रेणुका देशपांडे यांनीही गुणवंतांचे कौतुक केले. ओमप्रकाश केला यांनी प्रास्ताविक केले. संदीप विष्णोई यांनी आभार मानले.देशाला महासत्ता बनविण्यात चार्टर्ड अकाऊंटंटचा सिंहाचा वाटा असेल, असे गौरवोद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढले. ‘डीएमआयसी’ प्रकल्पामुळे भविष्यात ‘सीएं’ची मोठी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत ‘सीए’ना ‘सोल्युशन प्रोव्हायडर’ म्हणून काम करावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. या अभ्यासक्रमात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.