शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

भारनियमनामुळे गेवराईकर त्रस्त

By admin | Updated: June 15, 2014 00:56 IST

गेवराई: शहरात पाच ते सहा तास भारनियमन केले जाते. यामुळे उकाड्यासह इतर अनेक संकटांना गेवराईकरांना सामोरे जावे लागत आहे.

गेवराई: शहरात पाच ते सहा तास भारनियमन केले जाते. यामुळे उकाड्यासह इतर अनेक संकटांना गेवराईकरांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा रात्रीच्यावेळी वीज गायब होते. यामुळे नागरिकांना रात्र अंधारात चाचपडत काढावी लागते.पावसाळा सुरू झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने वातावरणात उष्णता वाढलेली आहे. उष्णतेपासून संरक्षण व्हावे, यासाठी महिला, मुले, वृद्ध व नागरिक विजेवरील उपकरणे पंखा, कूलर, एसी आदी सुरू करून घरामध्ये बसतात. असे असले तरी शहरात दुपारच्या वेळी व सायंकाळीही भारनियमन केले जाते. त्यामुळे विद्युत उपकरणाचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. ही उपकरणे बंद असल्याने नागरिकांना उकाड्यात बसावे लागते. गेवराईत दोन टप्प्यात भारनियमन होत असून याचा फटका व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. कधी-कधी पाच ते सहा तासांपेक्षा अधिक वेळ वीज नसते. यामुळे हॉटेल, रसवंतीगृह, ज्यूस सेंटर, झेरॉक्स सेंटर, कांडण यंत्र आदी छोट्या व्यावसायिकांचे उद्योग बंद पडतात. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे गेवराई शहरातील भारनियमन बंद करण्याची मागणी मनोज जैस्वाल, उमेश मानधने, रामेश्वर पाटेकर, महावीर मडकर आदींनी केली आहे. या संदर्भात महावितरणचे उपअभियंता सारडा म्हणाले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार भारनियमन करण्यात येत आहे. (वार्ताहर)उकाड्याने जनता मेटाकुटीसगेवराई शहरात पाच ते सहा तास केले जाते भारनियमन.भारनियमनामुळे विद्युत उपकरणे बंद असल्याने नागरिकांना सहन करावा लागतो उकाड्याचा त्रास.भारनियमनाचा छोट्या व्यावसायिकांनाही बसतो फटका.