शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘गेट’चा गुंता सुटेना

By admin | Updated: October 19, 2016 01:14 IST

विजय सरवदे , औरंगाबाद जिल्हा परिषदेला कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचे गेट खरेदी करायचे आहेत. त्यासाठी प्रशासनाने ई- टेंडरिंगचा सोपास्कारही केला;

विजय सरवदे , औरंगाबादजिल्हा परिषदेला कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचे गेट खरेदी करायचे आहेत. त्यासाठी प्रशासनाने ई- टेंडरिंगचा सोपास्कारही केला; पण तिन्ही वेळा पुरवठादारांकडून प्रतिसादच मिळाला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरवठादारांच्या ‘रिंग’पुढे प्रशासनाला झुकावे लागले असून, यासंदर्भात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्री बीड मीटिंग’मध्ये पुरवठादारांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर ई-टेंडरिंगच्या अटी-शर्र्थींमध्ये बदल करण्यास प्रशासन अखेर राजी झाले आहे. परतीच्या पावसानंतर साधारणपणे ३० आॅक्टोबर रोजी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे (गेट) बंद केले जातात. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. सगळे नदी-नाले- ओढे तुडुंब भरले आहेत. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटच नाहीत. काही बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेलेले आहेत, तर काही गंजल्यामुळे वापरात आणण्याजोगे नाहीत. त्यामुळे जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी पुढाकार घेत नवीन गेट खरेदी करण्यासाठी जि.प. उपकरातील अडीच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. निधीच्या खर्चास सर्वसाधारण सभेची मान्यताही घेतली. त्यानंतर जि.प. सिंचन विभागाने जलसंधारण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तांत्रिक मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. तब्बल सहा महिने तो प्रस्ताव तेथेच धूळखात पडून होता. अखेर अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी अधीक्षक अभियंत्यांची कानउघाडणी केल्यानंतर गेल्या महिन्यात तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर प्रशासनाने सर्वसाधारण सभेची गेट खरेदीच्या दरास मान्यता घेतली व ई- टेंडरिंग केली. दोन वेळा ३ पेक्षा कमी निविदा प्राप्त झाल्या. तिसऱ्यावेळी तर एकही निविदा प्राप्त झाली नाही. परिणामी, आता ३० आॅक्टोबरपर्यंत ‘गेट’ मिळण्याची आशा धुसर झाली असून तब्बल तीनही वेळा ई- टेंडरिंगला प्रतिसाद का मिळाला नाही, याबद्दल आज मंगळवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तमराव चव्हाण आणि सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पांढरे यांची बैठक झाली. या बैठकीत ‘प्री बीड मीटिंग’ बोलावण्यास सर्वांचे एकमत झाले. या बैठकीत संबंधित पुरवठादारांना बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर निविदेत गेट पुरवठा करण्याचा दिलेला ३० दिवसांचा कालावधी कमी वाटत असेल, तर वाढवण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे.