शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

आरगडे गव्हाणच्या स्वस्तधान्य दुकानाचा अनागोंदी कारभार!

By admin | Updated: December 20, 2015 23:46 IST

जालना : घनसावंगी तालुक्यातील आरगडेगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा अनागोंदी कारभार सुरु असून, मृतांच्या नावेदेखील धान्याची उचल केली जात आहे.

जालना : घनसावंगी तालुक्यातील आरगडेगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा अनागोंदी कारभार सुरु असून, मृतांच्या नावेदेखील धान्याची उचल केली जात आहे. मात्र, तहसील प्रशासन या दुकानदाराला अभय देत असल्याचा आरोप भाऊसाहेब सूर्यभान रंधे यांनी पुराव्यानिशी केला आहे.याबाबत रंधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी त्यांनी घनसावंगीच्या तहसीलदारांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु स्वस्तधान्य दुकानाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात आलेली नाही. परिणामी दुकानदाराचे मनोधैर्य वाढले आहे. ‘तहसील प्रशासन माझ्या म्हणण्यानुसार चालते’ असा दम दुकानदार देत असल्याचा आरोप रंधे यांनी निवेदनात केला आहे. दुकानदाराने हितसंबंध जपण्यासाठी धनदांडग्यांची नावे दारिद्र्यरेषेत टाकून त्यांना बीपीएल, एपीएलच्या शिधापत्रिका उपलब्ध करुन दिल्या आणि गरजवंतांना साधी शिधापत्रिकाही दिली नाही, असे नमूद करुन रंधे यांनी पुढे म्हटले, तलाठी, तहसीलदार यांच्याशी दुकानदार रमेश शिंदे यांचे संगनमत असल्यामुळे कार्डधारकांना रॉकेलपासून वंचित ठेवले जात आहे. गावात आॅगस्ट २०१५ पासून धान्य वितरीत करण्यात आलेले नाही. १५ आॅगस्टपासून शेतकरी लाभार्थ्यांचे धान्य देखील वाटप झालेले नाही. प्रत्येक महिन्यात धान्य व रॉकेल उचलून सुध्दा कार्डधारकांना धान्य वाटप केले नाही. याद्यांमध्ये अनेकांची बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप रंधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. (प्रतिनिधी)एकाच कुटुंबातील व्यक्ंितना वेगवेगळ्या योजनांमध्ये समाविष्ट करुन त्यांच्या नावे धान्य उचल करणे, मात्र वाटप न करता त्याची काळ्या बाजारात विक्री करणे, असे प्रकार सर्रासपणे केले जात असल्याचे रंधे यांचा आरोप आहे.४अंत्योदय, अन्न सुरक्षा, बीपीएल, पीडीएस या योजनेसाठी एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे.आरगडेगव्हाण येथील स्वस्ताधान्य दुकानदाराकडून वेगवेगळ्या प्रकारे होत असलेल्या गैरव्यवहाराच्या पुराव्याची जंत्रीच सूर्यभान रंधे यांनी सादर केली आहे. ज्यात लाभार्थ्यांच्या बोगस याद्या, मयत व स्थलांतरीतांची नावे, ५ कि.मी. अंतरापेक्षा दूूर असलेली २० कि.मी.अंतरावरील या दुकानास जोडलेल्या गावांची नावे निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.४गैरव्यवहाराचे पुरावे वारंवार देऊनही तहसील प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.