शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शहरात ‘कचरा कोंडी’ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:43 IST

शहरात मार्च २०१७ अखेर पासून निर्माण झालेला कचरा प्रश्न गंभीर बनला असून कचरा उचलण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदांनाही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला आता योग्य त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात मार्च २०१७ अखेर पासून निर्माण झालेला कचरा प्रश्न गंभीर बनला असून कचरा उचलण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदांनाही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला आता योग्य त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.शहरातील कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या एटूझेड या कंत्राटदाराने महापालिकेला एक महिन्याची मुदतपूर्व नोटीस देत ३१ मार्च २०१७ रोजी काम बंद केले. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता एटूझेडला कार्यमुक्त केले होते. परिणामी शहरातील कचºयाचा प्रश्न गंभीर बनला. महापालिका प्रशासनाने जवळपास ३०० हून अधिक कर्मचाºयांची मूळ स्वच्छता मजूर या पदावर नियुक्ती करुन स्वच्छतेच्या कामावर जाण्याचे आदेश दिले होते. मात्र स्वच्छता मजूर असलेले कर्मचारी प्रतिनियुक्तीवर महापालिका मुख्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालयात ‘साहेब’ बनले आहेत. त्यामुळे त्यांनी या आदेशातून पळवाटा कशा काढता येतील यासाठी आपआपल्या गॉडफादरकडे धाव घेतली. ही धाव यशस्वी झाल्याचे दिसत आहे.आजघडीला मूळ स्वच्छता मजूर असलेले कर्मचारीही कार्यालयामध्येच वेगवेगळी कामे करीत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेची ऐशी-तैशी झाली आहे. एटूझेड काम सोडण्यापूर्वी महापालिकेने फेब्रुवारीमध्ये निविदा मागवल्या होत्या. मात्र या निविदात दोनच कंत्राटदार सहभागी झाले. त्यातही जादा दर त्यांनी नमूद केले होते. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली. महापालिकेने पुन्हा कचºयासाठी निविदा मागवल्या होत्या. विशेष म्हणजे, या निविदांना महापालिकेने पाच वेळा मुदतवाढ दिली होती. त्यावेळी कुठे तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या.यातील ठाण्याच्या ‘अमृत एन्टरप्राईजेसने’ सर्वात कमी दर कचºया उचलण्यासाठी टाकला होता. १३७३ रुपये असा अमृतचा दर होता. वाटाघाटीसाठी जेव्हा अमृतला बोलावले त्यावेळी मात्र सदर ठेकेदाराने आपण काम करण्यास असमर्थ असल्याचे सांगताना आपल्या व्यवस्थापकाने चुकीने कमी दर टाकल्याचे नमूद करत निविदेतून माघार घेतली होती. मात्र ऐनवेळी निविदेतून माघार घेणाºया ‘अमृत’वर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी कठोर कारवाई करताना त्यांची ५० लाखांची इसारा रक्कम जप्त केली. तसेच तीन वर्षांसाठी ‘अमृत’ला काळ्या यादीतही टाकले. अन्य दोन ठेकेदारांना बोलावले मात्र त्यांनीही काम करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे पुन्हा ५ आॅक्टोबर २०१७ रोजी कचरा उचलण्यासाठी आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या. २६ आॅक्टोबरपर्यंत निविदा भरण्याची मुदत होती. या निविदांनाही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे महापालिका प्रशासनाने ६ नोव्हेंबर पर्यंत निविदा भरण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी किती ठेकेदार प्रतिसाद देतात याकडे आता लक्ष लागले आहे.