शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

शहरातच बनविले कचरा डेपो

By admin | Updated: August 20, 2016 01:20 IST

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी अनधिकृत कचऱ्याचे डेपो तयार करून तेथे हजारो टन कचरा आणून टाकणे सुरू केले आहे.

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी अनधिकृत कचऱ्याचे डेपो तयार करून तेथे हजारो टन कचरा आणून टाकणे सुरू केले आहे. दुसरीकडे नारेगावला पन्नास टक्के कचरा नेणे बंद झाल्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचल्याचा दावा अधिकारी आयुक्तांसमोर करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या या चमकोगिरीचा पर्दाफाश मनपा पदाधिकाऱ्यांनी केला.मागील एक वर्षापासून शहरात एका खाजगी कंपनीच्या आर्थिक सहकार्याने ‘माझी सिटी टकाटक’उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच नष्ट करण्याची योजना आखली. अनेक वॉर्डांमध्ये कचरा नष्ट करण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे मनपातील ‘चतुर’ अधिकाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढविली. आमखास मैदानाच्या पाठीमागे हजारो टन कचरा मागील वर्षभरापासून आणून टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औरंगपुरा येथे जिल्हा परिषदेच्या विसर्जन विहिरीजवळही लाखो टन कचरा आणून टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. हिमायतबाग परिसरातील उद्धवराव पाटील चौकाजवळ मनपा अधिकाऱ्यांनी अनधिकृत कचरा डेपो तयार केला आहे. मागील वर्षभरापासून परिसरातील नागरिकांना कचरा डेपोमुळे मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अनेकदा नागरिकांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांना सांगण्यात आले की, आम्ही ओला व सुका कचरा वेगळा करीत आहोत. नंतर हा कचरा उचलून नेण्यात येणार आहे. शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी शहरातील विसर्जन विहिरींची पाहणी केली. औरंगपुऱ्यातील जि. प. मैदानावर विसर्जन विहिरीजवळ कचऱ्याचे मोठमोठे डोंगर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हा कचरा इथे कसा आला या प्रश्नावर एकाही अधिकाऱ्याकडे उत्तर नव्हते. मनपाच्या अधिकाऱ्यांचे बिंग फुटताच अनेकांना घाम फुटला होता. यापुढे अनधिकृत ठिकाणी कचरा टाकताना दिसून आल्यास गंभीर कारवाईचा इशारा महापौरांनी दिला.४०० ते ५०० टन कचराशहरातील कचरा नारेगाव येथील डेपोवर नेऊन टाकण्यासाठी महापालिकेला दरवर्षी ३७ कोटी रुपये खर्च येतो. वर्षभरापूर्वी मनपाने ‘माझी सिटी टकाटक’उपक्रम राबवून नारेगावला जाणारा कचरा कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मनपा अधिकाऱ्यांनी या उपक्रमात मध्यम मार्ग शोधून काढून ठिकठिकाणी अनधिकृत कचरा डेपो तयार केले.