शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

भाजीच्या दुकानांसमोरच कचऱ्याचे ढिगारे

By admin | Updated: December 5, 2014 00:53 IST

परळी : शहरातील उड्डाणपूलावरुन उतरताच सुभाष चौक रोडकडे निघालेल्या नागरिकांना व दुचाकीधारकांना सामना करावा लागतो तो खांडे पूल, भाजी मार्केटसमोरील अस्वच्छतेचा.

परळी : शहरातील उड्डाणपूलावरुन उतरताच सुभाष चौक रोडकडे निघालेल्या नागरिकांना व दुचाकीधारकांना सामना करावा लागतो तो खांडे पूल, भाजी मार्केटसमोरील अस्वच्छतेचा. या परिसरात नाल्यावरच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. परळी नगर परिषदेने खांडी पूल नाल्यावर व्यापारी संकुल व भाजी मार्केट काढले आहे. या भाजी मार्केट समोरील पुलाजवळ नियमितपणे कचऱ्याचा ढिग आढळून येतो. या भागातून थर्मलकडे व थर्मलकडून परळी शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या भागात स्वच्छता करावी, अशी मागणी माजी नगरसेवक ज्ञानोबा आघाव, सामाजिक कार्यकर्ते नीलेश जगतकर, सोमनाथ गडेकर, साईनाथ मस्के यांनी केली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी वैद्यनाथ हे एक ज्योतिर्लिंग असल्याने दर्शनासाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर राज्यातील भाविकही दर्शनासाठी येत असल्याने शहरात स्वच्छता ठेवली पाहिजे. असे झाले तरच परळीचे नाव दुसऱ्या राज्यातही चांगले व स्वच्छ शहर म्हणून काढले जाईल. गंगाखेड-बीड या मार्गाने येणारे भक्त परळीत उड्डाणपूल, खांडी पूलावरून येतात. त्यांना घाणीचा सामना करतच शहरात यावे लागते. खांडी पूल नाल्यावर घाण व कचरा फेकण्यात येत आहे. समोरच भाजी विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे त्यांना याचा नेहमीच सामना करावा लागतो.गल्लोगल्लीत स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. हा परिसर स्वच्छ करण्यात येईल, असे न.प.ने सांगितले. (वार्ताहर)