शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

स्वच्छता अभियानाचा शहरात ‘कचरा’

By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST

जालना : नगर पालिकेकडून मोठा लवाजमा घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असली तरी शहरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे

जालना : नगर पालिकेकडून मोठा लवाजमा घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असली तरी शहरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली. विशेषत: अंतर्गत वसाहती, मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्यावर कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत.जालना नगर पालिका स्वच्छ भारत अभियात अंतर्गत मोहीम राबवित आहे. या अंतर्गत शहरातील विविध भागात पालिकेकडून दररोज शेकडो टन कचरा उचलल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी शहर कचरामयच असल्याचे स्पष्ट होत आहे.दररोज कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेकडे आवश्यक वाहने उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे सफाई कामगारांची संख्याही कमी असल्याने कचरा दररोज उचलला जात नाही. मात्र तीन-चार दिवसांना का होईना कचरा उचलला जातो. काही भागात आठवडाभरापर्यंतही कचरा उचलला जात नाही. अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. टाऊन हॉल परिसरात नाल्यातून काढलेला कचरा तसाच पडून आहे. हा रस्ता पुन्हा नाल्यांमध्ये जाणार असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. जुना जालन्यातील नूतन वसाहत, मुक्तेश्वर तलावाचा परिसर, रेल्वेस्टेशन परिसर, शनिमंदिर, बाजार चौकी परिसर, शास्त्री मोहल्ला, छत्रपती कॉलनी, नीळकंठ नगर, कचेरी रोड, गणपती गल्ली, टाऊन हॉल, गांधीचमन, मस्तगड पॉवर हाऊस तसेच नवीन जालन्यातील सुभाष चौक, महावीर चौक, पाणीवेस, सरोजनीदेवी रोड, मामा चौक, देऊळगावराजा रोड, कन्हैय्यानगर, जेईएस कॉलेज रोड, रामनगर, गांधीनगर, शिवाजीपुतळा परिसर इत्यादी भागात कचरा साचला आहे. (प्रतिनिधी)