शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

पालिकेत आणून टाकला कचरा

By admin | Updated: October 2, 2016 01:13 IST

वसमत: मुख्याधिकारी लक्ष देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी वसमत न.प.चे मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्या कॅबीनसह स्वच्छता विभागाच्या अभियंत्यांची कॅबीनमध्येही कचऱ्याचे ढिगारे आणून टाकले.

वसमत: नागरी सुविधांकडे मुख्याधिकारी लक्ष देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी वसमत न.प.चे मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्या कॅबीनसह स्वच्छता विभागाच्या अभियंत्यांची कॅबीनमध्येही कचऱ्याचे ढिगारे आणून टाकले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पुढाकारानेच हे आंदोलन झाले, हे विशेष. वसमत येथील शास्त्रीनगर, बहिर्जीनगर, ईपकलवारनगर, मयूरनगर, गणेशनगर या प्रभागात सांडपाणी वाहून जाण्याची समस्या आहे. गटारांचे काम न झाल्याने जागोजागी पाणी तुंबून राहते. दुर्गंधी व रोगराई पसरते. पावसामुळे तर रस्त्याने ये-जा करता येणेही अवघड झाले आहे. पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात नाल्यांचे पाणी शिरत असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक व वारंवार करतात. मात्र कोणी लक्ष देत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांनी तर वसमतमध्ये कधी पाऊल टाकले नसल्याने त्यांना रस्ते व शहराच्या समस्यांही माहीत नाहीत.या प्रकरासंदर्भात नगरसेवक राजेश पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांडपाण्याची विल्हेवाट लावा. अन्यथा नगरपालिकेत कचरा आणून टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शनिवारी दुपारी नगरसेवक राजेश पवार व परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टरमध्ये कचरा घेऊन न.प.गाठली. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ट्रॅक्टर आडवे लावून नागरिकांनी कचरा टोपले भरभरून मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या केबीनमध्ये भरून टाकला. त्यावेळी मुख्याधिकारी केबीनमध्ये हजर नव्हते. स्वच्छता विभागाचे अभियंता बळवंते यांचीही केबीन कचऱ्याने भरून टाकली. आज न.प.कार्यालयात सर्वत्र कचराच कचरा झालेला पहावयास मिळाला. या प्रकाराने शहरात प्रचंड खळबळ उडवून दिली. (वार्ताहर)