शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

औरंगाबादेत कचराकोंडीच, नव्या जागेसह स्थानिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 05:23 IST

शहरातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी कन्नड तालुक्यातील पिशोर येथील साखर कारखान्याच्या जागेवर टाकण्यास सुरुवात झाली असताना स्थानिकांसह राजकीय मंडळींनी विरोधाचे हत्यार उपसल्याने महापालिकेने कचरा टाकण्याची मोहीम थांबविली.ऐतिहासिक औरंगाबाद शहरात ‘न भूतो’अशी कचराकोंडी निर्माण झाली आहे. मागील पाच महिन्यांपासून शहरात कचरा पडून आहे. त्यावर उपाय शोधण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कचराकोंडी फोडण्यासाठी शनिवारी पुढाकार घेतला. शहरात पडून असलेला सर्व कचरा कन्नड तालुक्यात नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी शनिवारीच तालुक्यातील तीन जागांची पाहणी केली. त्यांच्यासोबत मनपाचे अधिकारी, तहसीलदारही होते. मात्र या तिन्ही ठिकाणी कचरा न टाकता रविवारी सकाळी पिशोर येथील बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर टाकण्याचा निर्णय घेतला. पालिकेनेही साचलेला कचरा हर्सूल, फुलंब्रीमार्गे सकाळी ११ वाजता पिशोरला पाठवून दिला. पिशोर येथे कचरा पोहोचल्यावर स्वत: हर्षवर्धन जाधव यांनी समोर उभे राहून २० ट्रक कचरा खाली केला. नागरिकांनी विरोध केल्याने पालिकेने ही मोहिम थांबवली़