शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यामुळे पर्यटकही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:03 IST

जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.गेल्या वर्षी जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख १२ हजार २०६ देशभरातील पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली, तर या वर्षात जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख ९ हजार ८७१ पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये जानेवारी ते जून २०१८ दरम्यान औरंगाबादेत येणाºया विदेशी पर्यटकांची संख्या ३७ हजार २८ एवढी आहे.यासंदर्भात टुुरिझम प्रमोटर्स गिल्डचे जसवंत सिंग म्हणाले की, औरंगाबादेत पर्यटक कशाला येतील आणि आम्ही तरी त्यांना तिकडे का पाठवावे, असा प्रश्न दिल्ली येथील इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संंस्थेने शहरातील टूर आॅपरेटर्स आणि एजंट यांना केला आहे. मागील महिन्यात इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संस्थेचे अध्यक्ष प्रणव सरकार हे शहरात येऊन गेले. तेव्हा ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग पाहून त्यांनी अत्यंत दु:ख व्यक्त केले आणि आता कचरा पाहण्यासाठी पर्यटकांना या शहरात पाठवावे का? असा सवाल के ला.शहरातील कचरा पर्यटकांनी पाहू नये म्हणून टूर एजंट लोकांना अनेक दिव्यातून जावे लागत आहे. विदेशी पर्यटकांना किंवा परराज्यांतून शहरात येणाºया पर्यटकांना शहरात फिरावयाचे असेल तर अक्षरश: कचरा लपवत फिरावे लागत आहे. भलेही लांबच्या रस्त्यावरून नेले तरी चालेल, पण जेथे कचरा आहे अशा रस्त्यांवरून पर्यटकांना नेणे टाळा, अशा सक्त सूचना टूर एजंटांनी चालकांना देऊन ठेवल्या आहेत. बीबीका मकबरा, पाणचक्की यासारख्या ठिकाणी पर्यटकांना नेण्यास खूप त्रास होतो. कचरा कि तीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे तो पर्यटकांच्या नजरेस पडतोच. यामुळे पर्यटक आपल्या शहराची वाईट प्रतिमा घेऊन मायदेशी जात आहेत. याचा परिणाम पुढच्या काळात नक्कीच पाहायला मिळेल. शहराची अशीच अपकीर्ती होत राहिली तर आगामी काळात शहरातील पर्यटनाला कचºयाचा फार मोठा फटका बसेल, अशी चिंता पर्यटन क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नtourismपर्यटन