शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कचऱ्यामुळे पर्यटकही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:03 IST

जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.गेल्या वर्षी जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख १२ हजार २०६ देशभरातील पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली, तर या वर्षात जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख ९ हजार ८७१ पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये जानेवारी ते जून २०१८ दरम्यान औरंगाबादेत येणाºया विदेशी पर्यटकांची संख्या ३७ हजार २८ एवढी आहे.यासंदर्भात टुुरिझम प्रमोटर्स गिल्डचे जसवंत सिंग म्हणाले की, औरंगाबादेत पर्यटक कशाला येतील आणि आम्ही तरी त्यांना तिकडे का पाठवावे, असा प्रश्न दिल्ली येथील इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संंस्थेने शहरातील टूर आॅपरेटर्स आणि एजंट यांना केला आहे. मागील महिन्यात इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संस्थेचे अध्यक्ष प्रणव सरकार हे शहरात येऊन गेले. तेव्हा ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग पाहून त्यांनी अत्यंत दु:ख व्यक्त केले आणि आता कचरा पाहण्यासाठी पर्यटकांना या शहरात पाठवावे का? असा सवाल के ला.शहरातील कचरा पर्यटकांनी पाहू नये म्हणून टूर एजंट लोकांना अनेक दिव्यातून जावे लागत आहे. विदेशी पर्यटकांना किंवा परराज्यांतून शहरात येणाºया पर्यटकांना शहरात फिरावयाचे असेल तर अक्षरश: कचरा लपवत फिरावे लागत आहे. भलेही लांबच्या रस्त्यावरून नेले तरी चालेल, पण जेथे कचरा आहे अशा रस्त्यांवरून पर्यटकांना नेणे टाळा, अशा सक्त सूचना टूर एजंटांनी चालकांना देऊन ठेवल्या आहेत. बीबीका मकबरा, पाणचक्की यासारख्या ठिकाणी पर्यटकांना नेण्यास खूप त्रास होतो. कचरा कि तीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे तो पर्यटकांच्या नजरेस पडतोच. यामुळे पर्यटक आपल्या शहराची वाईट प्रतिमा घेऊन मायदेशी जात आहेत. याचा परिणाम पुढच्या काळात नक्कीच पाहायला मिळेल. शहराची अशीच अपकीर्ती होत राहिली तर आगामी काळात शहरातील पर्यटनाला कचºयाचा फार मोठा फटका बसेल, अशी चिंता पर्यटन क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नtourismपर्यटन