शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या पोटावर पाय, मोठ्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 23:28 IST

सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. वसमतनंतर हिंगोलीतही अचानक रामलीला मैदान मोकळे केले. शहरातही पथकांनी अतिक्रमण काढायला सांगितले काहींनी काढले. काहींनी धीर धरला. मात्र हे सर्व गरिबांच्याच नशिबी आले ज्यांनी अतिक्रमित जागेवर लाखोंचे इमले उभे केले, त्यांचे काय? हा सवाल सार्वत्रिकपणे ऐकायला मिळत आहे.

ठळक मुद्दे रामलीला मैदान मोकळे केले.फेरीवाल्यांसाठी पर्यायी अशी जागाच शहरात कुठे नाहीमोठ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी कर्तव्यकठोरांच्या हाताला काय लकवा मारला काय,

हिंगोली : सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. वसमतनंतर हिंगोलीतही अचानक रामलीला मैदान मोकळे केले. शहरातही पथकांनी अतिक्रमण काढायला सांगितले काहींनी काढले. काहींनी धीर धरला. मात्र हे सर्व गरिबांच्याच नशिबी आले ज्यांनी अतिक्रमित जागेवर लाखोंचे इमले उभे केले, त्यांचे काय? हा सवाल सार्वत्रिकपणे ऐकायला मिळत आहे.हिंगोलीत मागील दीड-दोन वर्षांत अतिक्रमण हटाव मोहिमेचे वारे दर तीन-चार महिन्यांनी वाहू लागते. अतिक्रमणे काढताच ती दहा-पंधरा दिवसांनी पाय पसरतात. फेरीवाल्यांनी एकाच जागी ठाण मांडल्याने हा प्रश्न तसाही चिघळलेला आहे. दर चार-पाच दिवसांनी काहीतरी वाद होतात. कुणीतरी तक्रार करते. ती मनावर घेण्यासाठी एखाद्या महिन्याचा काळ उलटतो अन् पुन्हा अतिक्रमण हटावचा बिगूल वाजतो. मात्र आता वारंवार होणाºया या प्रकाराने किरकोळ विक्रेते वैतागले आहेत. शिवाय अतिक्रमण हटले की, जणू हक्काची जागा समजून ज्या रामलीला मैदानावर विक्रेते जायचे तेही आता मोकळे केले. शिवाय तेथे जाण्याचे रस्तेही प्रशासनाने खड्डे खोदून अवघड करून टाकले आहेत. त्यामुळे तेथे आता वाहनधारकांनाही ताबा करणे सोपे राहिले नाही.एकीकडे अतिक्रमणे काढली अन् दुसरीकडे फेरीवाल्यांसाठी पर्यायी अशी जागाच शहरात कुठे नाही. दिलीच तर तेही रामलीला मैदान व गांधी चौकाच्या पलिकडे जातील, असे वाटत नाही. मात्र आता उपासमारीची वेळ येत असल्याने ही मंडळी बड्यांच्या अतिक्रमणाकडे बोट दाखवत आहे. अधिकारी बदलीच्या भीतीने या अतिक्रमणांना अभय देतात का, असा सवाल केला जात आहे. मात्र एकजूटपणे त्याविरुद्ध मैदानात उतरण्याची तयारी कोणाचीच नाही. काही टपरीवाले वैयक्तिक निवेदने देऊन हैराण आहेत. अशा एकेका आवाजाला दाबणे शक्य आहे. मात्र एकीचे बळ वापरायचे तर प्रशासन सांगेल तसे वागायची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाला शांत होऊ देण्याचा काळच औषध ठरविण्याचा फंडा वापरला जात आहे. परंतु मोठ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी कर्तव्यकठोरांच्या हाताला काय लकवा मारला काय, ही डोळ्यात अंजन घालणारी झणझणीत प्रतिक्रिया प्रशासनाच्या कानी पडावी म्हणून माध्यमांचे उंबरे झिजवले जात आहेत. परंतु प्रशासनाची भूमिका मात्र दोलायमान आहे, हेही तेवढेच खरे.