शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

गरिबांच्या पोटावर पाय, मोठ्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 23:28 IST

सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. वसमतनंतर हिंगोलीतही अचानक रामलीला मैदान मोकळे केले. शहरातही पथकांनी अतिक्रमण काढायला सांगितले काहींनी काढले. काहींनी धीर धरला. मात्र हे सर्व गरिबांच्याच नशिबी आले ज्यांनी अतिक्रमित जागेवर लाखोंचे इमले उभे केले, त्यांचे काय? हा सवाल सार्वत्रिकपणे ऐकायला मिळत आहे.

ठळक मुद्दे रामलीला मैदान मोकळे केले.फेरीवाल्यांसाठी पर्यायी अशी जागाच शहरात कुठे नाहीमोठ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी कर्तव्यकठोरांच्या हाताला काय लकवा मारला काय,

हिंगोली : सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. वसमतनंतर हिंगोलीतही अचानक रामलीला मैदान मोकळे केले. शहरातही पथकांनी अतिक्रमण काढायला सांगितले काहींनी काढले. काहींनी धीर धरला. मात्र हे सर्व गरिबांच्याच नशिबी आले ज्यांनी अतिक्रमित जागेवर लाखोंचे इमले उभे केले, त्यांचे काय? हा सवाल सार्वत्रिकपणे ऐकायला मिळत आहे.हिंगोलीत मागील दीड-दोन वर्षांत अतिक्रमण हटाव मोहिमेचे वारे दर तीन-चार महिन्यांनी वाहू लागते. अतिक्रमणे काढताच ती दहा-पंधरा दिवसांनी पाय पसरतात. फेरीवाल्यांनी एकाच जागी ठाण मांडल्याने हा प्रश्न तसाही चिघळलेला आहे. दर चार-पाच दिवसांनी काहीतरी वाद होतात. कुणीतरी तक्रार करते. ती मनावर घेण्यासाठी एखाद्या महिन्याचा काळ उलटतो अन् पुन्हा अतिक्रमण हटावचा बिगूल वाजतो. मात्र आता वारंवार होणाºया या प्रकाराने किरकोळ विक्रेते वैतागले आहेत. शिवाय अतिक्रमण हटले की, जणू हक्काची जागा समजून ज्या रामलीला मैदानावर विक्रेते जायचे तेही आता मोकळे केले. शिवाय तेथे जाण्याचे रस्तेही प्रशासनाने खड्डे खोदून अवघड करून टाकले आहेत. त्यामुळे तेथे आता वाहनधारकांनाही ताबा करणे सोपे राहिले नाही.एकीकडे अतिक्रमणे काढली अन् दुसरीकडे फेरीवाल्यांसाठी पर्यायी अशी जागाच शहरात कुठे नाही. दिलीच तर तेही रामलीला मैदान व गांधी चौकाच्या पलिकडे जातील, असे वाटत नाही. मात्र आता उपासमारीची वेळ येत असल्याने ही मंडळी बड्यांच्या अतिक्रमणाकडे बोट दाखवत आहे. अधिकारी बदलीच्या भीतीने या अतिक्रमणांना अभय देतात का, असा सवाल केला जात आहे. मात्र एकजूटपणे त्याविरुद्ध मैदानात उतरण्याची तयारी कोणाचीच नाही. काही टपरीवाले वैयक्तिक निवेदने देऊन हैराण आहेत. अशा एकेका आवाजाला दाबणे शक्य आहे. मात्र एकीचे बळ वापरायचे तर प्रशासन सांगेल तसे वागायची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाला शांत होऊ देण्याचा काळच औषध ठरविण्याचा फंडा वापरला जात आहे. परंतु मोठ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी कर्तव्यकठोरांच्या हाताला काय लकवा मारला काय, ही डोळ्यात अंजन घालणारी झणझणीत प्रतिक्रिया प्रशासनाच्या कानी पडावी म्हणून माध्यमांचे उंबरे झिजवले जात आहेत. परंतु प्रशासनाची भूमिका मात्र दोलायमान आहे, हेही तेवढेच खरे.