शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

गंगापूर साखर कारखाना अखेर बँकेच्या ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:29 IST

गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना अखेर राज्य सहकारी बँकेने न्यायालयाच्या आदेशावरून ताब्यात घेतला. शेतकरी व सभासदांच्या कारखाना वाचविण्याच्या हालचालींना शेवटी विराम मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना अखेर राज्य सहकारी बँकेने न्यायालयाच्या आदेशावरून ताब्यात घेतला. शेतकरी व सभासदांच्या कारखाना वाचविण्याच्या हालचालींना शेवटी विराम मिळाला.उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार पोलीस संरक्षणात गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा सोमवारी दुपारी १२ वाजता घेण्यात आला.यावेळी बंद कारखाना देखभाल करणाºया सुरक्षा रक्षकांना गेल्या पाच महिन्यांचा पगार मिळाला नाही. याबाबत दत्तूसिंग ठाकूर यांनी बँकेचे अधिकारी व कारखाना व्यवस्थापनाकडे पगाराची मागणी केली, मात्र त्यांना संबंधितांनी चर्चेअंती यावर तोडगा काढू असे सांगितले. दरम्यान, उपस्थित उस उत्पादकांनी बँकेच्या कर्मचाºयांना कारखान्याच्या प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना तात्काळ अटक केली होती. बँकेचे प्राधिकृत अधिकारी बी. एम. राठोड आणि त्यांच्या कर्मचाºयांच्या उपस्थितीत कारखान्याचे व्हा. चेअरमन लक्ष्मण भुसारे, कार्यकारी संचालक बी.एम.पाटील, संचालक राजेंद्र वाबळे, देवीदास वाघ, सुभाष साळुंके, कल्याण सुकासे, बाबासाहेब गायकवाड, राजेंद्र दारूंटे, तुकाराम मिसाळ, गोरखनाथ तुपलोंढे, नानासाहेब गायके, रामेश्वर मुंदडा, अशोक जगताप, शेषराव जाधव, कारखाना कर्मचारी युनियनचे महेमूद पटेल, पांडुरंग कोंडूळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना स्थळावर ताबा प्रक्रियेचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यावर वरील सर्व संचालकांनी स्वाक्षरी करून कारखान्याचा ताबा सोडला.