शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

गणेश मंडळांना अन्न परवाना आवश्यक

By admin | Updated: September 1, 2016 01:07 IST

शिरीष शिंदे , बीड गणेश उत्सवादरम्यान भाविकांना वाटप होणाऱ्या अन्न पदार्थातून विषबाधेसारखी अप्रिय घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने

शिरीष शिंदे , बीडगणेश उत्सवादरम्यान भाविकांना वाटप होणाऱ्या अन्न पदार्थातून विषबाधेसारखी अप्रिय घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न पदार्थासाठीचा परवाना घेणे आवश्यक असल्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक पोलीस अधीक्षक व धर्मादाय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आले आहे.अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्यातील नियमन २०११ नुसार गणेश मंडळांना महाप्रसाद वाटप प्रसंगी घ्यावयाच्या काळजीची सूचना दिल्या गेली आहे. ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. तत्पूर्वी गणेश मंडळे धर्मादाय आयुक्त यांच्याकडून परवानगी घेतील. त्यामुळे सदर कार्यालयास अन्न व औषध विभागाने परिपत्रक पाठवून गणेश मंडळांना परवाना घेण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे. कोणत्याही ठिकाणी अन्नपदार्थ बनविताना त्यासाठीची काळजी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी करणे बंधनकारक आहे. अनेक गणेश मंडळे भंडारा / महाप्रसादाचे वाटप करतात. त्यामुळे त्यांना अन्न पदार्थ बनविताना घ्यावयाची काळजी सूचित करण्यात आली आहे.वांगी (ता. बीड) येथे महाप्रसादातून विषबाधा झाल्याने ५०० भाविकांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या.अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोळे, केस खाजवणे टाळावे, संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने अन्नपदार्थ बनवू नये. अन्नपदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत. शिळा प्रसाद भक्तांना वाटप करू नये. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करू नये. पिण्याचे पाणी निर्जुंतूक करूनच वापरावे. प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तीने हातमोजे, अ‍ॅप्रॉन घालावा. त्यांनी वैयक्तिक स्वच्छतेसह सर्व नियमांची अंमलबजावणी करावी. कच्च्या अन्नपदार्थांची खरेदी बिले बाळगावीत. तसेच ते पदार्थ परवानाधारक दुकानामधून खरेदी करावेत.