शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता प्राप्त करणे हे आंबेडकरी चळवळीचे ध्येय नाही

By admin | Updated: February 23, 2016 00:40 IST

जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही.

जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही. तर या देशात लोकशाही रूजली पाहिजे, टिकली पाहिजे, उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले तरी चालेल. परंतु लोकशाही बळकटीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांनी येथे केले. संत शिरोमणी गुरू रविदास व्याख्यानमालेत शेवटच्या पुष्पात ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्ष म्हणून आ. अर्जुन खोतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. अण्णा सावंत, राजेश राऊत, संतोष साबने, प्रकाश नारायणकर यांची होती.प्रा. डोळस म्हणाले की, या देशात आंबेडकरी चळवळीचे सूत्र आपण लक्षात घेतले पाहिजे, ज्या चळवळीने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायासाठी सातत्याने संघर्ष केला. हा संघर्ष पाण्यासाठी, कधी माणुसकीसाठी, कधी समतेसाठीचा संघर्ष आहे. तो कधीच एका जाती, जमातींसाठीचा संघर्ष नाही. या चळवळीने कधीच प्रतिक्रियावादी न होता समाजाला प्रतिक्रिया आपल्या कृती आणि उक्तीतून द्यायला भाग पाडले आहे. अगदी अप्रशिक्षीत समाज त्याकाळी आपल्यासोबत येऊन डॉ. बाबासाहेबांनी हा सर्वबदल केला. परंतु आज समाजामध्ये बुद्धीजिवी वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. हा बुद्धीजीवी वर्ग समाजाला योग्य ती दिशा देऊ शकतो. मात्र, तसे घडताना दिसून येत नाहंी. हा बुद्धीजीवी वर्ग स्वत:मध्येच मग्न झाला आहे. बुद्धीजीवी वर्गाने आज सजग होण्याची वेळ आली आहे. या वेळी समाजातील कार्यकर्त्यांचा चर्मकार युवा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्षी हा पुरस्कार गजानन इंगळे, बन्सीलाल ढवळे, जालिंदर वाघमारे, महंमद इरफान, महंमद इस्माईल बागवान, शंकर शिरगुळे या हा पुरस्कार दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा पवार, प्रा. टी. आर. जगताप यांनी केले. आभार गणेश चांदोडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अ‍ॅड. बी. एम. साळवे, सुधाकर निकाळजे, डॉ. विजय कुमठेकर, प्रा. बसवराज कोरे, विजय पंडित, बी. के. शिंदे, बी. आर. भालशंकर, दिपक इंगळे, बबनराव रत्नपारखे, संजय हेरकर आदी उपस्थित होते.