शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

सत्ता प्राप्त करणे हे आंबेडकरी चळवळीचे ध्येय नाही

By admin | Updated: February 23, 2016 00:40 IST

जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही.

जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही. तर या देशात लोकशाही रूजली पाहिजे, टिकली पाहिजे, उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले तरी चालेल. परंतु लोकशाही बळकटीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांनी येथे केले. संत शिरोमणी गुरू रविदास व्याख्यानमालेत शेवटच्या पुष्पात ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्ष म्हणून आ. अर्जुन खोतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. अण्णा सावंत, राजेश राऊत, संतोष साबने, प्रकाश नारायणकर यांची होती.प्रा. डोळस म्हणाले की, या देशात आंबेडकरी चळवळीचे सूत्र आपण लक्षात घेतले पाहिजे, ज्या चळवळीने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायासाठी सातत्याने संघर्ष केला. हा संघर्ष पाण्यासाठी, कधी माणुसकीसाठी, कधी समतेसाठीचा संघर्ष आहे. तो कधीच एका जाती, जमातींसाठीचा संघर्ष नाही. या चळवळीने कधीच प्रतिक्रियावादी न होता समाजाला प्रतिक्रिया आपल्या कृती आणि उक्तीतून द्यायला भाग पाडले आहे. अगदी अप्रशिक्षीत समाज त्याकाळी आपल्यासोबत येऊन डॉ. बाबासाहेबांनी हा सर्वबदल केला. परंतु आज समाजामध्ये बुद्धीजिवी वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. हा बुद्धीजीवी वर्ग समाजाला योग्य ती दिशा देऊ शकतो. मात्र, तसे घडताना दिसून येत नाहंी. हा बुद्धीजीवी वर्ग स्वत:मध्येच मग्न झाला आहे. बुद्धीजीवी वर्गाने आज सजग होण्याची वेळ आली आहे. या वेळी समाजातील कार्यकर्त्यांचा चर्मकार युवा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्षी हा पुरस्कार गजानन इंगळे, बन्सीलाल ढवळे, जालिंदर वाघमारे, महंमद इरफान, महंमद इस्माईल बागवान, शंकर शिरगुळे या हा पुरस्कार दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा पवार, प्रा. टी. आर. जगताप यांनी केले. आभार गणेश चांदोडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अ‍ॅड. बी. एम. साळवे, सुधाकर निकाळजे, डॉ. विजय कुमठेकर, प्रा. बसवराज कोरे, विजय पंडित, बी. के. शिंदे, बी. आर. भालशंकर, दिपक इंगळे, बबनराव रत्नपारखे, संजय हेरकर आदी उपस्थित होते.