शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

‘पंचायत राज’ च्या पद्भारानंतर पहिला दौरा गडचिरोलीचा : संभाजी पाटील निलंगेकर

By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST

दत्ता थोरे ,लातूर पंचायत व्यवस्था ही तळातील लोकांची व्यवस्था आहे. लोकशाहीच्या संकल्पनेने यश वरच्याला काय मिळते याच्यावर नाही तर खाली काय झिरपते याच्यावर अवलंबून आहे

दत्ता थोरे ,लातूरपंचायत व्यवस्था ही तळातील लोकांची व्यवस्था आहे. लोकशाहीच्या संकल्पनेने यश वरच्याला काय मिळते याच्यावर नाही तर खाली काय झिरपते याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामविकास ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय यंत्रणांना सरकारी योजना गावात नेण्यासाठी डोळ्यात तेल घालून प्रयत्न करेन. निवडीचा आनंद साजरा करणार नाही तर पदभार घेतल्यावर पहिला दौरा गडचिरोलीचा करुन तेथील गावांच्या विकासाला प्राधान्य देईन, अशा शब्दात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या निवडीचे स्वागत करताना ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पंचायत राज समितीचे अध्यक्षपद घोषित झाल्यानंतर ते खास ‘लोकमत’ला मुलाखत देताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पक्षाने मला या पदासाठी योग्य समजून जबाबदारी दिली, हे मी माझे भाग्य समजतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर चांगले काम करुन घेण्यासाठी ‘पंचायत’ सोपविली असे मी मानतो. कारण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सांगितले होते की, सरकार जेव्हा शंभर रुपये देते तेव्हा तळात दहा रुपये जातात. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने शंभर दिले तर शंभरच्या शंभर तळात जाऊ द्या, ही मोहीम हाती घेतली आहे. हा तळ म्हणजे गावची पंचायत आहे. विकासाचा केंद्रबिंदू गाव झाले पाहीजे, असे मानणारा मी कार्यकर्ता आहे. निलंगा सारख्या ग्रामीण भागातून राजकीय काम सुरू केल्याने गावच्या समस्या काय असतात ? हे मला ज्ञात आहे. युवा मोर्चाचा अध्यक्ष, पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम करताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे दौरे मी केले आहेत. स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही रस्त्याविना गावे, शाळांविना गावे, लाईटविना गावे, पाण्याविना गावे ही पाहिले की अस्वस्थ व्हायचो. आता ही मिळालेली संधी ती माझी अस्वस्थता दूर करण्यासाठी वापरेन. शेकडो योजना आहेत. निट अंमलबजावणी होत नाही. पारदर्शकतेचा अभाव आहे. योजना ज्यांच्यासाठी आहेत त्यांनाच योजनांची माहिती नाही. अशा प्रशासनातही चांगले अधिकारी आहेत पण त्यांनाही काही मर्यादा पडताहेत. यांच्यातला मला दुवा व्हायला निश्चितपणे आवडेल. म्हणून ही मी माझ्यासाठी उत्तम संधी मानतो. माझ्या सरकारने दिलेला तळासाठीचा निधी तळापर्यंत प्रशासन नेते की नाही, यावर पंचायत राज समितीचा अध्यक्ष म्हणून माझा डोळ्यात तेल घालून ‘वॉच’ असेल. मी जोपर्यंत पंचायत राज समितीच्या अध्यक्ष पदावर आहे, तोपर्यंत माझ्यासाठी गडचिरोली जिल्हा विशेष असेल. तळापर्यंत विकास न्यायचा तर मी कोरडाठाक् असलेला तळ प्रयोग म्हणून प्राधान्याने निवडेन तो म्हणजे गडचिरोलीचा. पायाभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या या जिल्ह्यातील गावात शासकीय योजना घेऊन जाण्यासाठी मी जिवाचे रान करेन. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.आ. संभाजीराव पाटील म्हणाले की, माझी निवड ही लातूरकरांसाठी आनंदाची बाब आहे. माझ्या रुपाने लातूरला हा मान पहिल्यांदाच मिळाला आहे. मराठवाड्यातूनही यापूर्वी एकदा चंद्रकांत दानवे यांची निवड झाली होती. त्यानंतर मराठवाड्यालासुद्धा हा मान पहिल्यांदाच आहे. त्यामुळे मायभूमी म्हणून मराठवाड्यावर माझे विशेष लक्ष असेल, असेही ते म्हणाले.