औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या हातोड्याने आजपर्यंत १९ बांधकामे पाडली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणतात, तुम्ही संयम ठेवा. मात्र नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १२ कामांबद्दल जैसे थेचा आदेश असून, अनेकांनी खर्च टाळण्यासाठी स्वत:हून अतिरिक्त मजले पाडण्यास सुरुवात केली आहे. बिल्डरांचे शिष्टमंडळ नागपूरमुक्कामी असून, मालमत्ता आहे त्या स्थितीत कायदेशीर कराव्यात, त्यासाठी शासन लावील तो दंड भरण्याची नागरिकांची तयारी आहे, असे अनेकांचे दबक्या आवाजात म्हणणे आहे. गुरुवारी अतिक्रमण हटाव पथकाने संतोष मंत्री यांच्या चाटे शाळेच्या मागे गट नं. १५८ मधील प्लॉट नं. १६/१७/१८ वर बांधलेल्या जी-प्लस ४ च्या इमारतीवरील दोन मजले पाडले, तर बीड बायपासवरील म्हस्के पंपाच्या बाजूला गट नं. ११६ मधील अंकुश आणि आॅथर यांच्याही इमारतीचे दोन मजले खिळखिळे करण्यात आले. खर्च वसुलीची जाणार नोटीसअतिरिक्त बांधकामे पाडण्यात अतिक्रमण हटाव पथकाने कोणतीही कसर सोडलेली नाही. दंडात्मक कारवाई व पाडापाडीचा यंत्रणेचा खर्च आता इमारतधारकांकडून वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या आदेशाने नोटिसा बजावण्यात येणार आहेत, असे सीईओ अशोक कायंदे व प्रशासक विजय राऊत यांनी सांगितले.
जी-प्लस ४ च्या दोन इमारतींवर ‘धडाडधूम’
By admin | Updated: December 12, 2014 00:55 IST