शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

वातावरणीय बदलामुळे भविष्य खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:44 IST

वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९५५.५५ मिमी असताना या पावसाळ्यात जवळपास निम्मा म्हणजेच ६६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात नांदेड जिल्ह्यातील तापमान पुढील काही वर्षांत वाढत जाणार असून २२ ते २६ ठिकाणी सातत्याने अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे.जिल्ह्यात यंदा ६६ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पडणाºया किनवट आणि माहूर तालुक्यात मात्र यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ५० टक्क्यांहून अधिक सरासरी पावसाने गाठली असली तरी हा पाऊस समप्रमाणात झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.६३ टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात तर त्या खालोखाल ९२.३० टक्के पाऊस हा नांदेड तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे किनवट आणि माहूर हे दोन तालुके आहेत. या दोन तालुक्यांची वार्षिक सरासरी प्रत्येकी १२४० मिमी इतकी आहे; पण या दोन्ही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमीच पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात ६०१.९८ मिमी म्हणजेच ४८.५५ टक्के तर माहूर तालुक्यात ५००.९२ मिमी पाऊस झाला. या पावसाची सरासरी केवळ ४० टक्के भरली आहे. देगलूर तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या केवळ ५१.३० टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात वार्षिक ९००.३० मिमी सरासरीपैकी ४६१.८२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये अर्धापूर-७८.८४ टक्के, भोकर-७०.७३, उमरी-६७.३१, कंधार-७५.५४, लोहा-७३.४४, हदगाव-६६.३१, हिमायतनगर-५५.९२, बिलोली-६४.०८, धर्माबाद-६१.५६, नायगाव-६६.४ टक्के आणि मुखेड तालुक्यात ७३.८४ टक्के वार्षिक सरासरीच्या पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा नांदेड तालुक्यात सर्वाधिक चार वेळा अतिवृष्टी झाली. तर मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव आणि मुखेड तालुक्यात प्रत्येकी एकवेळ अतिवृष्टी म्हणजेच २४ तासांत ६५ मिमीहून अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्याचवेळी किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांत मात्र एकदाही अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याचे यावर्षीची पावसाची आकडेवारी सांगते.