शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणीय बदलामुळे भविष्य खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:44 IST

वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९५५.५५ मिमी असताना या पावसाळ्यात जवळपास निम्मा म्हणजेच ६६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात नांदेड जिल्ह्यातील तापमान पुढील काही वर्षांत वाढत जाणार असून २२ ते २६ ठिकाणी सातत्याने अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे.जिल्ह्यात यंदा ६६ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पडणाºया किनवट आणि माहूर तालुक्यात मात्र यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ५० टक्क्यांहून अधिक सरासरी पावसाने गाठली असली तरी हा पाऊस समप्रमाणात झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.६३ टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात तर त्या खालोखाल ९२.३० टक्के पाऊस हा नांदेड तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे किनवट आणि माहूर हे दोन तालुके आहेत. या दोन तालुक्यांची वार्षिक सरासरी प्रत्येकी १२४० मिमी इतकी आहे; पण या दोन्ही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमीच पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात ६०१.९८ मिमी म्हणजेच ४८.५५ टक्के तर माहूर तालुक्यात ५००.९२ मिमी पाऊस झाला. या पावसाची सरासरी केवळ ४० टक्के भरली आहे. देगलूर तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या केवळ ५१.३० टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात वार्षिक ९००.३० मिमी सरासरीपैकी ४६१.८२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये अर्धापूर-७८.८४ टक्के, भोकर-७०.७३, उमरी-६७.३१, कंधार-७५.५४, लोहा-७३.४४, हदगाव-६६.३१, हिमायतनगर-५५.९२, बिलोली-६४.०८, धर्माबाद-६१.५६, नायगाव-६६.४ टक्के आणि मुखेड तालुक्यात ७३.८४ टक्के वार्षिक सरासरीच्या पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा नांदेड तालुक्यात सर्वाधिक चार वेळा अतिवृष्टी झाली. तर मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव आणि मुखेड तालुक्यात प्रत्येकी एकवेळ अतिवृष्टी म्हणजेच २४ तासांत ६५ मिमीहून अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्याचवेळी किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांत मात्र एकदाही अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याचे यावर्षीची पावसाची आकडेवारी सांगते.