शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

वातावरणीय बदलामुळे भविष्य खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:44 IST

वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९५५.५५ मिमी असताना या पावसाळ्यात जवळपास निम्मा म्हणजेच ६६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात नांदेड जिल्ह्यातील तापमान पुढील काही वर्षांत वाढत जाणार असून २२ ते २६ ठिकाणी सातत्याने अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे.जिल्ह्यात यंदा ६६ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पडणाºया किनवट आणि माहूर तालुक्यात मात्र यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ५० टक्क्यांहून अधिक सरासरी पावसाने गाठली असली तरी हा पाऊस समप्रमाणात झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.६३ टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात तर त्या खालोखाल ९२.३० टक्के पाऊस हा नांदेड तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे किनवट आणि माहूर हे दोन तालुके आहेत. या दोन तालुक्यांची वार्षिक सरासरी प्रत्येकी १२४० मिमी इतकी आहे; पण या दोन्ही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमीच पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात ६०१.९८ मिमी म्हणजेच ४८.५५ टक्के तर माहूर तालुक्यात ५००.९२ मिमी पाऊस झाला. या पावसाची सरासरी केवळ ४० टक्के भरली आहे. देगलूर तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या केवळ ५१.३० टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात वार्षिक ९००.३० मिमी सरासरीपैकी ४६१.८२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये अर्धापूर-७८.८४ टक्के, भोकर-७०.७३, उमरी-६७.३१, कंधार-७५.५४, लोहा-७३.४४, हदगाव-६६.३१, हिमायतनगर-५५.९२, बिलोली-६४.०८, धर्माबाद-६१.५६, नायगाव-६६.४ टक्के आणि मुखेड तालुक्यात ७३.८४ टक्के वार्षिक सरासरीच्या पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा नांदेड तालुक्यात सर्वाधिक चार वेळा अतिवृष्टी झाली. तर मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव आणि मुखेड तालुक्यात प्रत्येकी एकवेळ अतिवृष्टी म्हणजेच २४ तासांत ६५ मिमीहून अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्याचवेळी किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांत मात्र एकदाही अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याचे यावर्षीची पावसाची आकडेवारी सांगते.