शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

कारखान्यांचे भविष्य अंधारात!

By admin | Updated: June 2, 2014 00:49 IST

माजलगाव: तालुक्याला उसाबाबत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील ऊस पाण्याअभावी जळत आहेत.

माजलगाव: तालुक्याला उसाबाबत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील ऊस पाण्याअभावी जळत आहेत. माजलगाव तालुक्यातील उसावर अवलंबून असलेल्या १५ ते २० कारखान्याचे भविष्यच जणू काही या विजेच्या लपंडावामुळे अंधारात आले आहे. माजलगाव धरणाची उभारणी झाल्यानंतर धरण क्षेत्रात वाढ झाली. मागील वर्षी सर्वत्र दुष्काळ पडलेला असताना तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर उभे होते. या उसावर माजलगाव येथील दोन कारखान्यांसह मराठवाड्यातील १५ ते २० कारखाने अवलंबून आहेत. गतवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्यानंतर यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली. माजलगाव धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झाली. या भागातील उसावर अवलंबून असणार्‍या कारखान्यांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. कारण ज्या भागातून हा ऊस जातो, त्या भागातच विजेचा लपंडाव चालू आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे तर नुकसान होतच आहे, शिवाय या कारखान्यांना माजलगाव तालुक्यातून ऊस मिळणे अवघड झाले आहे. हे ऊस जळून जात असल्याने यावर अवलंबून असणार्‍या कारखान्यांचे भविष्य या विजेच्या लपंडावामुळे अंधारात आले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)