शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

कारखान्यांचे भविष्य अंधारात!

By admin | Updated: June 2, 2014 00:49 IST

माजलगाव: तालुक्याला उसाबाबत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील ऊस पाण्याअभावी जळत आहेत.

माजलगाव: तालुक्याला उसाबाबत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील ऊस पाण्याअभावी जळत आहेत. माजलगाव तालुक्यातील उसावर अवलंबून असलेल्या १५ ते २० कारखान्याचे भविष्यच जणू काही या विजेच्या लपंडावामुळे अंधारात आले आहे. माजलगाव धरणाची उभारणी झाल्यानंतर धरण क्षेत्रात वाढ झाली. मागील वर्षी सर्वत्र दुष्काळ पडलेला असताना तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर उभे होते. या उसावर माजलगाव येथील दोन कारखान्यांसह मराठवाड्यातील १५ ते २० कारखाने अवलंबून आहेत. गतवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्यानंतर यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली. माजलगाव धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झाली. या भागातील उसावर अवलंबून असणार्‍या कारखान्यांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. कारण ज्या भागातून हा ऊस जातो, त्या भागातच विजेचा लपंडाव चालू आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे तर नुकसान होतच आहे, शिवाय या कारखान्यांना माजलगाव तालुक्यातून ऊस मिळणे अवघड झाले आहे. हे ऊस जळून जात असल्याने यावर अवलंबून असणार्‍या कारखान्यांचे भविष्य या विजेच्या लपंडावामुळे अंधारात आले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)