शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

७२ तासांच्या जाचक अटीमुळे सोयगावात पीक विम्याचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:05 IST

सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामात तालुक्याचे प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकासह मका, ज्वारी, सोयाबीन, तूर, बाजरी आदी खरिपाच्या ...

सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामात तालुक्याचे प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकासह मका, ज्वारी, सोयाबीन, तूर, बाजरी आदी खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे; परंतु संबंधित कंपन्यांनी नुकसान झाल्याच्या कालावधीपासून ७२ तासांच्या आत नुकसानीची तीव्रता संबंधित टोल फ्री क्रमांकावर कळविण्याबाबतची अट अनिवार्य केली होती. मात्र, पीक विम्याची रक्कम भरूनही नुकसानीची इत्यंभूत माहिती अनेक बाधित शेतकऱ्यांना कंपनीला देता आलेली नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तालुक्याची खरिपाची अंतिम आणेवारी ४७ टक्के इतकी घोषित झालेली आहे. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आत महसूल प्रशासनाने खरिपाची आणेवारी असल्याची माहिती संबंधित कंपन्या आणि जिल्हा प्रशासनाला कळविलेली आहे. मात्र, कंपन्या टोल फ्री क्रमांकाच्या कॉलवर ठाम आहेत. अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्याने ७२ तासांची ही जाचक अट त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. यावर तातडीने तोडगा काढून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा सरसकट मंजूर करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

चौकट

बोंडअळीच्या नुकसानीवर निर्णय नाही

अतिवृष्टीनंतर अचानक सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवर बोंड अळींचा प्रादुर्भावही झाला होता. तालुका प्रशासनाने बोंडअळींच्या प्रादुर्भावाने शंभर टक्के क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविलेला आहे, मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.