शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

पुढे पाठ; मागे सपाट..!

By admin | Updated: July 18, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५ लाख ४९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट होते.

उस्मानाबाद : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५ लाख ४९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात उद्दिष्टाहून अधिक म्हणजे, ६ लाख ६ हजार ६१७ रोपांची लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. असे असतानाच वन विभागाच्या वतीने घाटंग्री रस्त्यालगत असलेल्या वनक्षेत्रात लागवड केलेली रोपे कक्षरश: करपून जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, या क्षेत्रात वृक्षारोपणाचे काम सुरू असल्याने वृक्षप्रेमींना वन विभागाच्या कारभाराबाबत ‘पुढे पाठ, मागे सपाट’ या युक्तीचा अनुभव येत आहे.उस्मानाबाद शहरापासून काही किमी अंतरावर आणि घाटंग्री रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या क्षेत्रातील काही भागात वृक्षांचे प्रमाण विरळ झाले आहे. अशा ठिकाणी वन विभागाकडून नव्याने रोपांची लागवड करण्यात येत आहे. परंतु, ही लागवड करताना खड्डे खोल खोदण्याची तसदी वन विभागाकडून घेतली जात नसल्याचे प्रत्यक्ष खड्डे पाहिल्यानंतर दिसून येते. विशेष म्हणजे, ही रोपे खड्ड्यामध्ये नव्हे, तर खड्ड्यातून निघालेल्या मातीच्या भरावावर लागवड केली आहेत. अनेक भरावाखाली दगडांच्या शिळा आहेत. त्यामुळे सदरील जागा वृक्षरोपनासाठी योग्य आहे की नाही, हे पाहण्याचे कष्टही वन विभागाने घेतले नाही. परिणामी अशा भरावांवरील रोपे करपून गेली आहेत. दरम्यान, लावगड केलेल्यापैकी सध्या पन्नास टक्केही रोपे जगण्याच्या अवस्थेत नाहीत. यानंतरही वन विभागाने रोपांच्या संगोपनाकडे लक्ष न दिल्यास आणखी पंधरा ते वीस टक्के रोपे वाया जाऊ शकतात. दरम्यान, लागवड केलेली रोपे योग्य संगोपनाअभावी करपून जात असताना दुसरीकडे मात्र, वृक्ष लागवडीचा सपाटा सुरूच आहे. त्यामुळे वन विभागाकडून वृक्षारोपणाचा हा फार्स दिखाव्यापुरता तर केला जात नाही ना, असा सवाल आता वृक्षप्रेमींतून उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. (प्रतिनिधी) खड्डे अर्धा फुटही नाही !वन विभागाने वृक्षारोपण करण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. हे खड्डेही फार खोल खोदण्यात आलेले नाहीत. साधारणपणे अर्धा फुट खोलीचे खड्डे आहेत. या खड्ड्यांतून निघालेल्या मातीच्या भरावावर रोपांची लागवड केली आहे. मातीमध्ये दगडांचे प्रमाण अधिक असल्याने लागवड केलेली रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे या पैकी किती रोपे जगतात? की नुसते खड्डेच शिल्लक राहतात, हे येणाऱ्या काळातच दिसून येईल.साठविलेली रोपेही गेली वाया?वन विभागाच्या वतीने वनक्षेत्राच रोपांचा स्टॉक करून ठेवण्यात आला आहे. हीच रोपे सदरील रोपे वनक्षेत्रात लागवड केली जात आहेत. परंतु, या रोपांचीही व्यवस्थीत देखभाल केली जात नसल्याने शेकडो रोपे करपून गेली आहेत. एकीकडे गरजेच्या प्रमाणात रोपे उपलब्ध नसल्याने शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी खाजगी रोपवाटीकांतून रोपे विकत घेऊन लागवड केली. तर दुसरीकडे वन विभागाने स्टॉक करून ठेवलेल्यापैकी मोठ्या प्रमाणात रोपे करपून गेली आहेत.