शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

निधी वाटपाचे भिजत घोंगडे !

By admin | Updated: December 24, 2016 21:54 IST

बीड सत्ताधाऱ्यांतच उभी फूट पडल्याने वित्त आयोगाच्या निधी वाटपाचा तिढा कायम आहे.

संजय तिपाले बीडसत्ताधाऱ्यांतच उभी फूट पडल्याने वित्त आयोगाच्या निधी वाटपाचा तिढा कायम आहे. कुठल्याही क्षणी जि.प., पं.स. ची आचारसंहिता लागू होईल अशी स्थिती व समाजकल्याण समितीने घाईघाईत मंजुरीचा ठराव घेतलेला असताना प्रशासकीय मान्यतेचे घोडे मात्र अडलेलेच आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तेराव्या वित्त आयोगातील सव्वा कोटी रुपयांचा निधी समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी परस्पर आष्टी मतदारसंघाकडे वळविल्यानंतर काही सदस्यांनी त्यास आक्षेप नोंदविले होते. येथून सुरु झालेल्या बेबनावाच्या नाट्यावर पडदा पडणे तर दूरच; पण त्यात रोज नव्या अंकाची भर पडू लागली आहे. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित व सभापती महेंद्र गर्जे यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने पेच वाढला आहे. १५ डिसेंबर रोजी जि. प. च्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत निधीवाटपाचा विषय साधा चर्चेतही आला नाही;परंतु अंतर्गत खेळ्या काही थांबलेल्या नाहीत. पहिल्या टप्प्यात परस्पर सव्वाकोटी रुपये आष्टीला पळविल्याचा गर्जेंचा वार अध्यक्ष पंडित यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांनी हा निधी रोखून गर्जेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. पाठोपाठ उर्वरित २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप करुन ‘समन्यायी’च्या मुद्द्यावर भर दिला.दुसरीकडे सर्वसाधारण सभेत चर्चेतही न आलेल्या निधीवाटपावर दुसऱ्याच दिवशी समाजकल्याण समितीच्या बैठकीत महेंद्र गर्जे यांनी मंजुरीची मोहोर उमटवून नवा डाव टाकला. तत्पूर्वी पंडित गटाच्या गेवराई पं.स.मधील राकाँच्या सदस्या कमल डोळस व कुमशी (ता. बीड) येथील ग्रा.पं. सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब वाघमारे यांनी खंडपीठात याचिका दाखल केल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. न्यायालयाने जि.प. प्रशासनाला दोन आठवड्यांत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत; परंतु अद्याप जि.प.ने म्हणणे मांडलेले नाही. दरम्यान, समाजकल्याण समितीने निधीवाटपास मंजुरी घेतली असली तरी निधी वाटपाचे नियोजन झालेले नाही. अध्यक्ष पंडित सर्व भागांना समान निधी वाटप झाला पाहिजे, या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर सभापती गर्जे यांनी प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी जोर लावला आहे.