शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

१६ कोटी ५८ लाखांचा निधी पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:09 IST

लातूर : घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया, दोन शौचालय, तीन नागरी वनीकरण कामासाठी लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मिळाला

लातूर : घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया, दोन शौचालय, तीन नागरी वनीकरण कामासाठी लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मिळाला. या निधीतील १ कोटी रुपये स्वच्छता भारत अभियानाकडे वर्ग केला असून, उर्वरित १६ कोटी ५८ लाख ८२ हजारांचा निधी खर्चाविना पडून आहे. लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून टप्प्याटप्प्याने निधी मंजूर झाला. घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचे संकलन करण्यासाठी १० सप्टेंबर २०१५ रोजी पहिल्या टप्प्यात काही निधी मिळाला. त्यानंतर २३ डिसेंबर २०१५ आणि पुन्हा १९ सप्टेंबर २०१६ अशा तीन टप्प्यांत एकूण १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी लातूर मनपाला मिळाला. १३ व्या वित्त आयोगातूनही २ कोटी ७६ लाखांचा निधी मिळाला. मात्र लातूर प्रशासनाने हा निधी घनकचरा संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रियेसाठी खर्च केला नाही. मनपाच्या शेष फंडातीलच निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्यात आला. त्यामुळे १७ कोटी ५८ लाख ८२ हजार निधीतील १६ कोटी ५८ लाख ८२ हजारांचा निधी गेल्या ११ महिन्यांपासून पडून आहे. स्वच्छता भारत अभियानाकडे यातील १ कोटीची रक्कम वर्ग केली. मात्र घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही. प्रस्तुत निधी शासनाकडे परत जाणार नसला, तरी मनपाच्या कोषातच पडून राहिला आहे. त्यामुळे प्रशासनावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एलईडी तसेच स्ट्रेचिंग ग्राऊंड कम्पाऊंडच्या बांधकामाची कामे नियोजित आहेत. सध्या मनपाच्या कोषात २५ कोटी ३० लाख ३४ हजार रक्कम शिल्लक आहे. त्यात १४ व्या वित्त आयोगात मिळालेल्या १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचाही समावेश आहे. यातील फक्त १ कोटीची रक्कम स्वच्छ भारत अभियानाकडे वर्ग झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे गटनेते रविशंकर जाधव, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, महादेव बरूरे, शिवसेनेच्या सुनीता चाळक यांनी या निधीच्या अनुषंगाने प्रशासनाला धारेवर धरले. निधी दडवून का ठेवला गेला? त्यातून घनकचरा व्यवस्थापनाचे काम का केले नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. शिल्लक असलेल्या २५ कोटी ३० लाख ३४ हजार रकमेपैकी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी १ कोटी वर्ग करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. २९ मार्च २०१६ रोजी पुन्हा दुसरा ठराव घेण्यात आला. त्यानंतर ३० आॅगस्ट २०१६ रोजी अमृत योजनेकरिता ठराव घेण्यात आला. मात्र प्रत्यक्ष काम केले नसल्याने नगरसेवकांत नाराजी आहे.