शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

१६ कोटी ५८ लाखांचा निधी पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:09 IST

लातूर : घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया, दोन शौचालय, तीन नागरी वनीकरण कामासाठी लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मिळाला

लातूर : घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया, दोन शौचालय, तीन नागरी वनीकरण कामासाठी लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मिळाला. या निधीतील १ कोटी रुपये स्वच्छता भारत अभियानाकडे वर्ग केला असून, उर्वरित १६ कोटी ५८ लाख ८२ हजारांचा निधी खर्चाविना पडून आहे. लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून टप्प्याटप्प्याने निधी मंजूर झाला. घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचे संकलन करण्यासाठी १० सप्टेंबर २०१५ रोजी पहिल्या टप्प्यात काही निधी मिळाला. त्यानंतर २३ डिसेंबर २०१५ आणि पुन्हा १९ सप्टेंबर २०१६ अशा तीन टप्प्यांत एकूण १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी लातूर मनपाला मिळाला. १३ व्या वित्त आयोगातूनही २ कोटी ७६ लाखांचा निधी मिळाला. मात्र लातूर प्रशासनाने हा निधी घनकचरा संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रियेसाठी खर्च केला नाही. मनपाच्या शेष फंडातीलच निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्यात आला. त्यामुळे १७ कोटी ५८ लाख ८२ हजार निधीतील १६ कोटी ५८ लाख ८२ हजारांचा निधी गेल्या ११ महिन्यांपासून पडून आहे. स्वच्छता भारत अभियानाकडे यातील १ कोटीची रक्कम वर्ग केली. मात्र घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही. प्रस्तुत निधी शासनाकडे परत जाणार नसला, तरी मनपाच्या कोषातच पडून राहिला आहे. त्यामुळे प्रशासनावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एलईडी तसेच स्ट्रेचिंग ग्राऊंड कम्पाऊंडच्या बांधकामाची कामे नियोजित आहेत. सध्या मनपाच्या कोषात २५ कोटी ३० लाख ३४ हजार रक्कम शिल्लक आहे. त्यात १४ व्या वित्त आयोगात मिळालेल्या १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचाही समावेश आहे. यातील फक्त १ कोटीची रक्कम स्वच्छ भारत अभियानाकडे वर्ग झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे गटनेते रविशंकर जाधव, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, महादेव बरूरे, शिवसेनेच्या सुनीता चाळक यांनी या निधीच्या अनुषंगाने प्रशासनाला धारेवर धरले. निधी दडवून का ठेवला गेला? त्यातून घनकचरा व्यवस्थापनाचे काम का केले नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. शिल्लक असलेल्या २५ कोटी ३० लाख ३४ हजार रकमेपैकी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी १ कोटी वर्ग करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. २९ मार्च २०१६ रोजी पुन्हा दुसरा ठराव घेण्यात आला. त्यानंतर ३० आॅगस्ट २०१६ रोजी अमृत योजनेकरिता ठराव घेण्यात आला. मात्र प्रत्यक्ष काम केले नसल्याने नगरसेवकांत नाराजी आहे.