शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

वित्त आयोगाची कामे धिम्या गतीने

By admin | Updated: November 17, 2016 00:26 IST

बीड १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच शासनाने थेट निधी उपलब्ध करून दिला.

संजय तिपाले बीड१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच शासनाने थेट निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कामे धिम्या गतीने सुरू असून, आतापर्यंत ५४ कोटी ९० लाख ५२ हजार रुपयांपैकी केवळ २७ कोटी ९ लाख ३५० रुपये खर्च झाले आहेत.जिल्ह्यात १ हजार २३ ग्रा.पं. असून, १४ व्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात ५४ कोटी ९० लाख ५२ हजार रुपये एवढा निधी मिळाला होता. यातून पाणीपुरवठा, दुरुस्ती देखभाल, जलस्रोत बळकटीकरण, स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन, डासमुक्त गावासाठी शोषखड्डे, ग्रा.पं., अंगणवाडी इमारत, दिवाबत्ती व इतर दुरुस्ती कामे करावयाची आहेत. ३ लाखांहून अधिक निधी खर्च करण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविणे अनिवार्य करण्यात आले आहे. वित्त आयोगातून घसघशीत निधी मिळाल्याने गाव कारभाऱ्यांत समाधान असले तरी निधी करण्यात ग्रा.पं. पिछाडीवरच आहेत. वित्त आयोगाद्वारे जिल्ह्यात ३८४८ कामे मंजूर झाली होती. यामध्ये पाणी पुरवठ्याच्या सर्वाधिक १७४९ कामांचा समावेश आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासंबंधी कामांवर ग्रामपंचयतींचा भर आहे. यापैकी २३५७ एवढीच कामे पूर्णत्वाकडे गेली असून, १४९१ कामे अपूर्ण आहेत.२७ कोटी ८० लाख ७० हजार ६५० रुपये एवढा निधी हा अखर्चित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल पाठविण्यास सर्वच गटविकास अधिकाऱ्यांनी विलंब केला आहे. त्यामुळे त्यांना जि. प. च्या पंचायत विभागाने कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.पाच वर्र्षांत ४५७ कोटींची कामेवित्त आयोगातून पाच वर्षांत तब्बल ४५७ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निधी अखर्चित असतानाच आणखी ७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.