शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

वित्त आयोगाची कामे धिम्या गतीने

By admin | Updated: November 17, 2016 00:26 IST

बीड १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच शासनाने थेट निधी उपलब्ध करून दिला.

संजय तिपाले बीड१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच शासनाने थेट निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कामे धिम्या गतीने सुरू असून, आतापर्यंत ५४ कोटी ९० लाख ५२ हजार रुपयांपैकी केवळ २७ कोटी ९ लाख ३५० रुपये खर्च झाले आहेत.जिल्ह्यात १ हजार २३ ग्रा.पं. असून, १४ व्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात ५४ कोटी ९० लाख ५२ हजार रुपये एवढा निधी मिळाला होता. यातून पाणीपुरवठा, दुरुस्ती देखभाल, जलस्रोत बळकटीकरण, स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन, डासमुक्त गावासाठी शोषखड्डे, ग्रा.पं., अंगणवाडी इमारत, दिवाबत्ती व इतर दुरुस्ती कामे करावयाची आहेत. ३ लाखांहून अधिक निधी खर्च करण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविणे अनिवार्य करण्यात आले आहे. वित्त आयोगातून घसघशीत निधी मिळाल्याने गाव कारभाऱ्यांत समाधान असले तरी निधी करण्यात ग्रा.पं. पिछाडीवरच आहेत. वित्त आयोगाद्वारे जिल्ह्यात ३८४८ कामे मंजूर झाली होती. यामध्ये पाणी पुरवठ्याच्या सर्वाधिक १७४९ कामांचा समावेश आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासंबंधी कामांवर ग्रामपंचयतींचा भर आहे. यापैकी २३५७ एवढीच कामे पूर्णत्वाकडे गेली असून, १४९१ कामे अपूर्ण आहेत.२७ कोटी ८० लाख ७० हजार ६५० रुपये एवढा निधी हा अखर्चित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल पाठविण्यास सर्वच गटविकास अधिकाऱ्यांनी विलंब केला आहे. त्यामुळे त्यांना जि. प. च्या पंचायत विभागाने कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.पाच वर्र्षांत ४५७ कोटींची कामेवित्त आयोगातून पाच वर्षांत तब्बल ४५७ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निधी अखर्चित असतानाच आणखी ७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.