शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत ...

औरंगाबाद : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि महानगरपालिका यांच्यातर्फे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत जनसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालये, एनजीओ, शासकीय आणि खाजगी संस्थांचा सहभाग या उपक्रमात अपेक्षित आहे.

२ ऑक्टोबर रोजी या महोत्सवाच्या निमित्ताने सायकल रॅली आणि फ्रीडम वॉकचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियाना अंतर्गत ‘स्वच्छता’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. कॅनॉट परिसरात स्ट्रीटस् फॉर पीपल, सेंट्रल नाका ते एमजीएम आणि सलीम अली सरोवर ते टीव्ही सेंटर रोडवर सायकल फॉर चेंज म्हणजेच सायकलिंग ट्रॅकची निर्मिती, खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत खाम नदी परिसरात खेळाचे मैदान बनवणे, वृक्षारोपण करणे, नदी काठावर स्ट्रीट लाईट बसवणे, पेंट युवर सिटी अंतर्गत खाम नदीकाठी वसलेल्या घरांच्या बाहेरील भिंती रंगवणे, महानगरपालिकेच्या जलकुंभाची रंगरंगोटी करणे, पेंट युवर स्ट्रीट अंतर्गत शहरातील रस्ते आणि चौक येथे रंगरंगोटी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर आणि घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यांची रंगरंगोटी करणे आदी समावेश आहे. प्रत्येक उपक्रमानुसार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे उपक्रम राबवले जाणार आहेत.

राष्ट्रगान उपक्रम

२ ऑक्टोबरला सकाळी ७.५० वाजता शहरातील नागरिक सन्मानाने उभे राहून भारताचे राष्ट्रगीत म्हणतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत राष्ट्रगीत शक्य नसल्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर आपल्या राष्ट्रगीताचा व्हिडिओ पोस्ट करावा. त्यातून किती नागरिक उपक्रमात सामील झाले, याची हे तपासण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.